पहा नवीन अपडेट

शैक्षणिक लेख व अन्य माहिती पूर्ण आशा शैक्षणिक ब्लॉगवर आपले मन:पूर्वक स्वागत.

11 February 2018

भारतीय शिक्षण प्रसारक संस्था, अंबाजोगाई चे कोषाध्यक्ष विनायकरावजी पोखरीकर यांनी पुस्तक भेट देऊन तर शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष श्री. शशिकांतजी टेकाळे यांनी शाल श्रीफळ व पुष्प गुच्छ देऊन श्री. कोरे यांना सन्मानित केले. यावेळी उपस्थित विद्यालयाचे सन्माननीय मुख्याध्यापक संतोषजी देशमुख, शिक्षक प्रतिनिधी पिंपळे सर, कोदरकरजी, अरुण पत्की सर…

N.N.C. All India Treaking Camp Tirupati (A.P) येथील राष्ट्रीय संचलनात सुवर्ण पदक पटकावणारे अंबाजोगाई येथील श्री.खोलेश्वर विद्यालयाचे इयत्ता 9 वी तील प्रविण शंकर तिडके  व रोहन भागवत सांगळे या विद्यार्थ्यांचा पुष्पगुच्छ देऊन शाळा सिद्धी राज्य निर्धारक देविदास कोरे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला यावेळी उपस्थित प्रशालेचे उपमुख्याध्यापक अनंतराम कोपलेजी, प्रशिक्षक शैलेंद्र कंगळे सर, जयेंद्र कुलकर्णी सर, विलास गायकवाड, प्रसिद्धी प्रमुख श्रीकांत देशपांडे सर इ…

N.N.C. विभागाने प्राप्त केलेले विविध मेडल्स, ट्रॉफी,व पुरस्कारांची पहाणी करताना अंबाजोगाईच्या श्री.खोलेश्वर विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या समवेत देविदास कोरे, प्रशालेचे उपमुख्याध्यापक अनंतराम कोपले, जयेंद्र कुलकर्णी सर, ,प्रसिद्धी प्रमुख श्रीकांत देशपांडे, विलास गायकवाड सर इ..
मानव संसाधन व मनुष्यबळ विकास मंत्रालयाकडून राष्ट्रीय स्तरावर 'बालश्री' पुरस्कारासाठी निवड झालेली व कलर्स मराठी वाहिनीवर सुरु असलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनावरील मालिकेत ' पहाट झाली ग !' या गीताची नवोदित पार्श्व गायिका अंबाजोगाईच्या श्री. खोलेश्वर विद्यालयात इयत्ता 9 वी च्या वर्गात शिकणारी प्रतिभावान कु. ऋचा कुलकर्णी या विद्यार्थिनींचा प्रमाणपत्र देऊन शाळा सिद्धी राज्य निर्धारक देविदास कोरे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. या प्रसंगी आकाशवाणीचे मान्यताप्राप्त गायक व विद्यालयातील संगीत शिक्षक जयंद्रजी कुलकर्णी सर, उप मुख्याध्यापक अनंतराम कोपले सर, शैलेंद्रजी कंगळे सर, विलास गायकवाड सर श्रीकांत देशपांडे इ..
कै. मिनाक्षीताई मोहरीर विभागीय वक्तृत्व स्पर्धेत रोख पाच हजार रुपये, स्मृती चिन्हं व प्रमाणपत्र प्राप्त करणारी अंबाजोगाई येथील श्री.खोलेश्वर विद्यालयाची कु. भक्ती अतुलजी देशपांडे या विद्यार्थिनीशी भा. शि. संस्था कार्यालयात संवाद साधतांना शाळा सिद्धी राज्य निर्धारक देविदास कोरे सोबत उपस्थित संस्थेचे कोषाध्यक्ष विनायकरावजी पोखरीकर, शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष शशिकांत टेकाळेजी प्रशालेचे मुख्याध्यापक संतोषजी देशमुख, उपमुख्याध्यापक अनंतराम कोपले सर, श्रीकांत देशपांडे सर…


विद्यालयातील उपक्रमांची दिशा श्री खोलेश्वर विद्यालयाचा दर्जा दर्शविते - श्री देविदास कोरे


अंबाजोगाई: केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालय अंतर्गत महाराष्ट्र राज्य विद्या प्राधिकरण, पुणे द्वारा शाळा सिध्दी उपक्रमाचा भाग म्हणून शाळा तपासणी तथा बाह्यमूल्यमापन सामारोप प्रसंगी विद्यालयातील सर्व विभाग प्रमुख व शिक्षकांना मार्गदर्शन करताना शाळा सिद्धी बाह्य राज्यनिर्धारक श्री. देविदास कोरे म्हणाले, की अंबाजोगाई येथील श्री. खोलेश्वर माध्यमिक विद्यालयातील विविध उपक्रम विद्यासभा अंतर्गत चालतात हि स्तुत्य बाब असून त्यामुळे विद्यार्थी विकासाला संधी मिळते व विद्यार्थ्यांची गुणवत्ता सातत्याने वृदिंगत होवून विद्यालयाच्या सर्वांगीण प्रगतीचा आलेख उंचावतो. याप्रसंगी मंचावर भा.शि.प्र.संस्थेचे कोषाध्यक्ष श्री. विनायकराव पोखरीकर, शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष श्री शशिकांतराव टेकाळे, मुख्याध्यापक श्री. संतोषराव देशमुख, उपमुख्याध्यापक अनंतराम कोपले, शिक्षक प्रतिनिधी पिंपळे सर, पर्यवेक्षक अरूण पत्की उपस्थित होते.
         पुढे बोलताना कोरे म्हणाले, की तपासणी करताना शिक्षकांनी आपआपल्या विभागातील अहवाल लेखी स्वरूपात अद्यावत ठेवले असून ही उल्लेखनीय बाब असल्याचे मत व्यक्त केले. विद्यालयातील मूल्यमापन, क्रीडाविभाग, विज्ञान प्रयोग शाळा, ग्रंथालय, संगीत, चित्रकला, शालेय पोषण आहार, एन एन सी , स्पर्धा परीक्षा, कार्यालयीन व प्रसिध्दी विभाग इत्यादी विभागाची तपासणी केली असता विद्यालयातील उपक्रमांची दिशा विद्यालयाचा दर्जा दर्शविते या शब्दात विद्यालयात राबवण्यात येणाऱ्या उपक्रमाचा त्यांनी गौरव केला.
विजेचा स्वतःचा सौर ऊर्जा प्रकल्प राबून हि शाळा आपला एक वेगळा ठसा व आदर्श राज्यापुढे निर्माण करत आहे. सामाजिक बांधिलकी म्हणून विवेक ग्राम दत्तक योजना अंतर्गत अंबाजोगाई तालुक्यातील वरवटी गाव या शाळेने पंधरा वर्षासाठी दत्तक घेऊन वृक्षारोपन व पाणी बचती संदर्भात जनजागृतीचे काम असो की आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या मुलाच्या मोफत शिक्षणाची केली जाणारी सोय हि या शाळेची सामाजिक बांधिलकी उल्लेखनीय बाब असून केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे हे संस्थेचे ब्रीद आपल्या क्रातीयुक्त योगदानातून हि शाळा पूर्ण करत असल्याचे मत श्री. कोरे यांनी व्यक्त केले. व संस्थेने मुलांना शुद्ध पाणी पुरवठ्याची योजना कार्यान्वित करण्याची या प्रसंगी संस्था पदाधिकाऱ्यांना सूचना केली.
विद्यालयातील गुणवंत विद्यार्थीनी पार्श्वगायिका ऋचा कुलकर्णी, उत्तम वक्ता असलेली भक्ती देशपांडे , एन एन सी कँप मधिल गोल्ड मेडल प्राप्त करणारे रोहण सांगळे व प्रविण तिडके या विद्यार्थ्यांचे कोरे यांनी पुष्पगुछ देऊन त्यांचे अभिनंदन केले. व पुढे शाळा सिद्धी राज्य निर्धारक देविदास कोरे यांनी विद्यालय 'अ' श्रेणीत असल्याने राष्ट्रीय स्तरावरील तपासणीस विद्यालयाने अधिक सज्ज रहावे व शाळेला 'अ' श्रेणी कायम रहावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.
अध्यक्षीय समारोपात शशिकांतजी टेकाळे यांनी मुख्याध्यापक व सर्व शिक्षक, कर्मचा-यांचे अभिनंदन केले व पुढील शैक्षणिक वर्षात शाळेची गुणवत्ता वाढविण्यासाठी अधिकाधिक परिश्रम घेतले जातील व या विद्यालयाच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वोत्तपरी प्रयत्न केले येतील तसेच तात्काळ शुद्ध पाणीपुरवठ्याची व्यापक योजना शाळेत सुरू केली जाईल अशी या प्रसंगी ग्वाही दिली. या वेळी सर्व विभाग प्रमुख, शिक्षक बंधू भगिनी यांची उपस्थिती होती.
समारोप प्रसंगी अंबाजोगाई येथील श्री. खोलेश्वर विद्यालयातील उपस्थित सर्व विभाग प्रमुख व शिक्षक ....

27 December 2016

अल्प परिचय
नाव :- देविदास नामदेवराव कोरे
शैक्षणिक पात्रता:-  [एम. ए. बी. एड.]
पद:- मुख्याध्यापक
अनुभव:- १६ वर्ष
कार्यरत शाळा:-  जयहिंद विद्यालय सिंदीजवळगा तालुका निलंगा जिल्हा लातूर
लेखन:- राज्यातील विविध वर्तमान पत्र व मासिकातून राजकीय, सामाजिक व शैक्षणिक विषयावरील अनेक लेख व कविता प्रकाशित. अंकुर सुविचार संग्रह, यशोदीप मराठी निबंध लेखन व व्याकरण इयत्ता १० वी सराव पुस्तिका इत्यादी पुस्तके प्रकाशित.
सन्मान:- सामाजिक संस्थांचे जिल्हा व राज्यस्तरावरील कांही पुरस्कार प्राप्त.
छंद :- वाचन, मनन, चिंतन तथा लेखन. सामाजिक बांधिलकीतून समाज कार्यात सहभाग.
ब्लॉग:- devidaskore.blogspot.in या ब्लॉग वर विविध विषयावरील लेख प्रकाशित.

संपर्क नंबर:- 9730325000/9420869000  

20 November 2016

मूल्यशिक्षण : दशा व दिशा

मूल्यशिक्षण  हा शिक्षणाचा मूलाधार आहे. शिक्षणातून सुसंस्कृत मानव घडावा. समाजाचा  नेतिक स्तर उंचावा म्हणून प्राचीन गुरुकुल पद्धतीपासून ते १९८६ च्या राष्ट्रीय शेक्षणिक धोरणापर्यंत चारित्र्य संवर्धनावर विशेष भर देण्यात आला. १९६४ मध्ये शिक्षण आणि राष्ट्रीय विकास या शिक्षण आयोगात डॉ. कोठारी यांनी नेतिक मुल्यांची जोपासना हे शिक्षणाचे प्रमुख उदिष्ट  मानले.
   माणसाला स्वताचे माणूसपण शिक्षणातून गवसले पाहिजे. विद्यार्थ्याचे मन, शरीर व आत्मा या त्रीयी मध्ये जे सुप्त उतमत्व आहे. त्याचा सर्वांगीण विकास घडवणं, शिलवान, चारित्र्य संपन्न,संस्कारक्षम पिढी निर्माण कारण या दृष्टीकोनातून उद्याचा आदर्श भारत आजच्या शालेय वर्गातून घडला पाहिजे. ही महात्मा गांधी, रवींद्रनाथ टागोर, डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची सर्वकष अपेक्षा होती. पण ती आजच्या शिक्षणातून सध्या होत आहे का? असा प्रश्न निर्माण होत आहे.
व्यक्तीचा सर्वांगीण विकास हे शिक्षणाचं ध्येय आहे. मानवी जीवनाच्या  बॊद्धिक, सामाजिक, राजकीय, आर्थिक, भोतिक, सोदर्यविषयक व सांकृतिक अंगाबाबत जे उत्कृष्ट नेतिक व समाजमान्य आहेत. ती मुल्य विद्यार्थ्यात संक्रमित झाली पाहिजेत. व्यक्तीचं अंतर्बाह्य जीवन सुखी, शांत, समाधानी, विकसित व उन्नत व्हावं, सत्य, सुंदर, हि मुल्य मनात रुजावीत हे मुल्य शिक्षणाचं व्यापक उद्धिष्ट आहे. व्यक्तिगत, सामाजिक, व राष्ट्रीय मुल्य विद्यार्थ्यात अनओपचारिक शिक्षणातून संस्करीत होणे आपेक्षित आहे.मूल्य ही अमूर्त संकल्पना आहे. सुसंस्कारित व्यक्तीच्या आचार विचारातून मूल्य व्यक्त होतात. प्रत्यक्ष आचरणातून मूल्यांचे संरक्षण, जतन संवर्धन व संक्रमण होत असते. सुसंस्कासंपन्न व्यक्तिमत्व हा मूल्यशिक्षणाचा उद्देश आहे. या दृष्टीने मूल्यशिक्षण व्यक्तित्व विकासाचे साधन आहे.
माणूस किती वर्ष जगला यापेक्षा तो कसा जगावा हे महत्वाचे आहे. म्हणून मूल्याशिक्षणाचा हेतू व्यापक आहे.पण आज शाळांत दिल्या जाणाऱ्या मूल्यशिक्षणातून तो सफल होत आहे का ? स्वावलंबन, श्रमप्रतिष्ठा, राष्ट्रभक्ती, वेज्ञानिक दृष्टीकोन, समता, बंधुभाव, अहींसा, मानवता, शिस्त, संवेदनशीलता, न्यायप्रियता, सोजन्य, सहिष्णूता, खिलाडूवृत्ती, सर्वसमभाव, परस्पर सहकार्य, आदरभाव, राष्ट्रीय एकात्मता, आदी मूल्यापेकी किती मूल्य सध्या दिल्या जाणाऱ्या मूल्याशिक्षणातून विद्यार्थ्यात संस्कारीत संक्रमित होत आहेत ?  शांतता,  सामंजश्य, सहानभूती, सरह्दयता, या प्रवृत्ती विद्यार्थ्यात जोपासल्या जात आहेत का ? वर्तन, शील, चारित्र्य, त्याग, सारासार विवेक, समतोल दृष्टी, निरपेक्ष वृत्ती, हे व्यक्तिमत्वाचे पेलू विकसित होत आहेत का ? मूल्यशिक्षणातून किती विद्यार्थ्यात आत्मभानाची जाणीव विकसित होत आहे.
गुरुजन वाडीलधारी माणसं याना आजच्या विद्यार्थ्याकडून मान आदर मिळतो का ? नसेल तर आशी परिस्थिती का निर्माण व्हावी याला जबाबदार असलेल्या घटकांनी आत्मशोध घेणे आवश्यक नाही का ? सध्या मूल्यशिक्षण शाळांमधून कर्तव्यनिष्ठेने, व प्रभावीपणे दिले जाते का ? या प्रश्नांची उत्तरे फारशी समाधानकारक नाहीत हि वस्तविकता प्रांजळपणे मान्य करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांच्या मनोवृत्तीत आपण आत्तापर्यंत सर्वसाधारण मूल्यही का संस्कारित करू शकलो नाही. याचा अंतर्मुख होऊन विचार करण्याची गरज निर्माण होत आहे.
समाजात अस्थिरता, अशांतता, अविश्वास, स्वार्थ, लाचारी, धर्मांधता, कटुता द्वेश, भ्रष्टाचार, तिरस्कार, अनाचार, या दुष्प्रवृत्ती फोफावत आहेत. माया स्नेह, आपुलकी, जिव्हाळा, दया, क्षमा, शांती, सरह्द्यता,सहानभूती, व मानवता संपत आहे. शिस्त, ज्ञान, शील, प्रामाणीकपणा चारित्र्य याला  गोणत्त्व येत आहे.
झटपट श्रीमंत कसे होता येईल ? याकडेच अनेकांचे लक्ष लागले आहे. यातूनच समाजविघातक हिंसक प्रवृत्ती बळावत आहेत. समाजाचा नेतिक स्तर खालावत आहे. त्याग, तत्त्वनिष्ठा, सहिष्णूता,सत्य, सदाचरण, इत्यादी मूल्य पायदळी तुडवली जात आहेत. बेईमानी, फुटीरता, कट्टर धार्मिकता, संकुचित प्रादेशिकता जातीयता, भ्रष्टाचार, चंगळवाद बोकाळला आहे. उबग आणणारं सत्तापिपासू राजकारण ,केबल, दूरदर्शन मालिका, चित्रपट यातून होत असलेले मूल्यहीन संस्कार या अनेकविध समाजविघातक अनिष्ट प्रवृत्तींचा कळत नकळत, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष परिणाम बालवयातील संस्कारक्षम मुलांवर होणे अपरिहार्य आहे. समाजव्यवस्थाच आशा अपप्रवृत्तीत रुतत चालली असल्याने प्राचीन भारतीय संस्कृतीतील आदर्श मूल्यांना तडे जात आहेत.
समाज परिवर्तनाची दिशा ठरवण्याचं सामर्थ्य मूल्यशिक्षणात असलं तरी सध्या शिक्षण हा व्यवसाय झाला आहे. त्याला पुरती बाजारू अवकळा आली आहे. शिक्षणा विषयी काडीचीही आस्था नसणाऱ्या राज्यकर्त्यांनी शिक्षणक्षेत्रात धुमाकुळ घातला आहे. शेक्षणिक दुरदृष्ठीचा आभाव, ध्येयवादाचा दुष्काळ, प्रवेशातील भ्रष्टाचार बिनबोभाट सुरु आहे. निकाल वृद्धीसाठी आनिष्ट् मार्ग आवलबण्याची प्रवृत्ती वाढत आहे. शिक्षण क्षेत्राचं हे चित्र निराशाजनक आहे.
शाळांतून जे मूल्यशिक्षण विद्यार्थ्यांना देणं, रुजवणं, संक्रमित  तथा संस्कारित होणं अभिप्रेत आहे. त्यालाच भ्रष्ट शिक्षण प्रक्रियेत  तिलांजली मिळत आहे. परिणामत: मूल्यशिक्षणाची दिशा व दशा खालावत आहे. ही चिंताजनक बाब आहे. मूल्यशिक्षणाची आशी स्थिती व्हावी ही एक प्रकारची शोकांतिकाच नव्हे का ? आजच्या शिक्षणातून माणूस घडत आहे कि बिघडत आहे.? आस प्रश्न निर्माण होत आहे. शिकलेली मुलं बंद, मोर्चे, लुटालूट, जाळपोळ,,  मोडतोड आशी हिंसक कृत्य करतात. समाजविघातक प्रवृत्ती, लाचलुचपत, व्यासनांधता, बेजबाबदारी, झुंडशाही, अविवेक, विध्वंसक प्रवृत्ती इत्यादी आजच्या शिक्षण व्यवस्थेची कटू अपत्यच नव्हेत का ? या बाबीचा गांभीर्याने विचार होणे आवश्यक आहे.
मुळात शिक्षणाचा संबंध आचार विचार व वर्तनाशी आहे. म्हणून विद्यार्थ्यांच्या मनावर मूल्य सुसंस्कारित व्हावीत या दृष्ठीने विचार व आचारात साम्य  पाहिजे. खरं म्हणजे घर हीच पहिली संस्कार शाळा आहे. म्हणून घराघरातून सोख्य, प्रेम,दया, त्याग, सत्य, नम्रता, सदभाव, राष्ट्रभक्ती इत्यादी सद्गुणांची जपणूक वडिलधाऱ्या व्यक्तींच्या विचार आचारातून होणे आवश्यक आहे.
बालवयात झालेले संस्कारमूल्य चिरकाल टिकून राहतात. म्हणून कुटूंब व शाळांतून सुसंस्कारासाठी अनुकूल वातावरण निर्माण केले पाहिजे. जीवनातील संकटं आवाहनं पेलण्याचं सामर्थ्य व बळ मुलांना सुसंस्कारातून लाभत लाभत असते. त्यामुळे मुलांच्या निकोप शारीरिक व मानसिक वाढीकडे माता,पिता,कुटूंब, समाज, शाळा व गुरुजनांकडून जाणीवपूर्वक लक्ष देणे आवश्यक आहे. तरच योग्य वयात विध्यार्थ्यात अक्षर जीवन मूल्यांचे बीजारोपण होऊन मूल्यशिक्षणाचा हेतू साध्य होईल असा विश्वास वाटतो.
- देविदास कोरे
मुख्याध्यापक
जयहिंद विद्यालय सिंदीजवळगा
ता.  निलंगा जि. लातूर
मो. नं -97 30 32 5000
Email ID: devidaskore21@gmail.com

18 November 2016

शिक्षकांच्या मानगुटीवर सेल्फीचा खुळ खुळा

लीकडे शिक्षण क्षेत्रात दिवसागणिक नव नवीन प्रयोग सुरू आहेत. ते आता शिक्षकांच्याही अंगवळणी पडत आहेत. एखाद्या दिवशी शिक्षण खात्याचा नवीन नियम वाचण्यात आला नाही अथवा कानावर पडला नाही तर शिक्षकांना ओशाळल्यासारखे होऊन आज कालचा जुनाच दिवस आहे की काय ? असा भाबडा भ्रम होतो ! ही सध्याच्या शिक्षणक्षेत्रातील वास्तविकता आहे. ती कशी नाकारता येईल ?
शिक्षणाच्या आयचा घो होय ! आता असे म्हणायचीच स्थिती सध्याच्या शिक्षण व्यवस्थेत निर्माण झाली आहे. तीन नोव्हेंबर २०१६
रोजी स्थलांतरित होणाऱ्या व शाळेत अनियमित राहणाऱ्या मुलांना शाळेत नियमित करण्याबाबत शासन निर्णय घेण्यात आला असून त्यामुळे शिक्षण क्षेत्रात एकाच खळबळ उडाली आहे. जानेवारी २०१७ पासून महिन्याच्या दर सोमवारी शाळेच्या पटावर असलेल्या वर्गातील मुलांची उपस्थिती पडताळण्यासाठी वर्ग शिक्षकांनी मुलांचे दहा दहा चे गट करून त्यांची सेल्फी काढावी. या सेल्फी मध्ये असलेल्या मुलांची नावे आणि आधार क्रमांकासह हे सेल्फी फोटो शिक्षण खात्याच्या सरल वेबसाईटवर ऑनलाईन अपलोड करायवे. असे निर्देश या शासनादेशात देण्यात आले आहेत.
राज्यातील कांही शाळांमध्ये दोन हजारांपेक्क्षाही अधिक विध्यार्थी संख्या आहे. दहा दहा च्या गटात वर्ग शिक्षकांने मुलांसोबत सेल्फी काढायची म्हंटले तर दिवस तरी पुरेल का ? हे काढलेले सेल्फीचे फोटो ऑनलाईन अपलोड कराचे ! खेड्यापाड्यातील किती शाळांमध्ये संगणक चालू स्थितीत आहेत? जलदगती इंटरनेट ची सुविधा वस्ती, पाडे, तांडे व खेड्यातील शाळांमध्ये आहे का ? कांही शाळांमध्ये मुख्याध्यापकांची पदे रिक्त आहेत तर बहुतांश शाळांत पुरेशा संख्येत शिक्षक नाहीत. या वस्तुस्थितीचा कसलाही विचार न करता शिक्षण खात्याने  अफलातून निर्णय घेवून शिक्षकांच्या हाती मात्र सेल्फीचा खुळ खुळा दिला आहे. आता दीपावली सुट्ट्या संपून जिल्याहातील शाळा २१ नोव्हेंबर पासून सुरु होत आहेत. खेड्यातील शाळांमध्ये सुरवातीचे तीन चार दिवस मुलांची उपस्थिती नगण्य असते. सुरवातीच्या आठवड्यात शाळेचे तोंड न पाहणाऱ्या मुलांना शाळेत आणून सेल्फी काढण्यासाठी शिक्षकांना कमालीची कसरत करावी लागणार आहे. त्यामुळे शिक्षकांमधून तीव्र संताप व्यक्त होत असून शिक्षण क्षेत्रात एकाच खळबळ निर्माण झाली आहे.
शिक्षकांची नेमणूक नेमकी कशासाठी आहे ? असा प्रश्न आता प्रामुख्याने निर्माण झाला आहे ? शिक्षकांनी मुलांना शिकवायचे सोडून ही व अशीच अन्य कामे करायची का ? वर्गात मुलांना शिकवण्यासाठी शिक्षकांना पुरेसा वेळ मिळाला नाही तर मुले कशी शिकतील ? ती प्रगत होतील का ? शिक्षकांना आशा कामात जर गुंतवून ठेवले तर शाळा कशा प्रगत होतील ? असे अनेक गंभीर प्रश्न निर्माण होत असून हा निर्णय अव्यवहार्य असल्याच्या प्रतिक्रिया शिक्षकांमध्ये उमटत आहेत. शिक्षणाचा मूळ हेतू गुंडाळून ठेवून वस्तुस्थितीचा कसलाही विचार न करता सेल्फी सारखे निर्णय होत असतील तर ही खेदाची बाब आहे.
देविदास कोरे
(लेखक, जयहिंद विद्यालय सिंदीजवळगा ता. निलंगा जि. लातूर येथे मुख्याध्यापक आहेत.)
पूर्व प्रसिद्धी -  दै. ‘पुण्यनगरी’ दि. १७ नोव्हें २०१६

10 November 2016

माती…… ( Kavita )

मी
हातातले
मोती
फेकून दिले.
अन ….
हातात
माती घेतली
मोत्या पेक्षा
मातीच
मला
मोलाची वाटली.
ती
मुठभर माती
मला
जगण्याचं बळ
वाटली.
त्या
मातीचा
वास
मला
परिचित होता.
बापाने
आयुष्यभर
गाळलेल्या
घामाचाच
तिला
गंध होता.
ती माती
मीतसाच
न्याहाळीत होतो
आयुष्य माझं
तिच्या
स्रजनक्षमतेत
उलगडत….
शोधत….
होतो.
- देविदास कोरे ( लातूर )
MO - 97 30 32 5000
Email: devidaskore21@gmail.com.

22 October 2016

आधार .....

जखमी मनाला
खळखळून वाहयचं असतं
कुठं तरी मोकळी वाट
शोधायचं असतं.  
ओघळणारे अश्रू
थांबणार नसले…
तरी...
जगायचा आधार
पेलायचं असतं.
ऊन सावलीच्या खेळात
उभारायचं असतं
आशा निराशेच्या छायेत
वावरायचं असतं.
आदर्शाच्या आधारानं
वाढायचं असतं
वर वर आकाशाला
भिडायचं असतं.
- देविदास कोरे (लातूर )
मो. नं - 97 30 32 5000
Email: devidaskore21@gmail.com.

27 June 2016

देविदास कोरे यांची मराठी विषय विभागीय कार्यशाळेसाठी निवड

Devidas Kore Pasport Calar Fotho.jpg


निलंगा:-                                                                                                                        

शासनाच्या प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत  दिनांक २९ व ३० जून २०१६ या कालावधीत औरंगाबाद येथे होण्याऱ्या दोन दिवसीय विभागीय मराठी विषयाच्या कार्यशाळेसाठी लातूर जिल्ह्यातून सिंदीजवळगा ता. निलंगा येथील जयहिंद विद्यालयाचे मुख्याध्यापक देविदास कोरे यांची निवड झाली आहे.जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, वैजापूर जि. औरंगाबाद या संस्थेमार्फत प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत विभागीय स्तरावर मराठी विषयाची ही दोन दिवसीय निवासी कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. त्यात लातूर जिल्ह्यातून देविदास कोरे यांची निवड झाल्याबद्दल श्री. शामागीर शिक्षण संस्थेचे सचिव ए. आर. लांडगे गुरुजी, कार्याध्यक्ष वसंतराव पाटील, मराठवाडा मुख्याध्यापक संघाचे सचिव दिलीपराव धुमाळ, लातूर विभागीय मंडळाचे माजी सदस्य तानाजी पाटील, निलंगा तालूका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष ज्ञानदेव बरमदे, सचिव अजय मोरे, डॉ. राजेश्वर पाटील, मुख्याध्यापक एस. एन. शिरमाळे, संजय कदम, पी. आर. रेड्डी, एच. बी. दिवे, एस. बी. परिहार यांनी या निवडीबद्दल अभिनंदन करून कार्यशाळेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

23 June 2016

बहूजन उद्धारक : राजर्षी शाहू महाराज



इतिहासात अनेक राजे झाले पण जनतेच्या ह्दयावर अधिराज्य करणारे राजे बोटावर मोजण्याइतकेच झाले. त्यामध्ये राजर्षी शाहू महाराज अग्रस्थानी आहेत. ' बहूजन हित व बहूजन सुख'  या करीता आपली राजसत्ता राबवणारा लोककल्याणकारी राजा म्हणूनही  त्यांचा उल्लेख केला जातो.
छञपती शाहू महाराज जनतेचे राजे होते. ते जसे मानवतेचे उपासक होते तसे गरीबांचे उद्धारकही होते. राजर्षी शाहू समंजस व दृष्टे युगपुरुष होते. म्हणून राजा कसा असावा ? तर तो शाहू महाराजांसारखा असावा असे म्हंटले जाते. लोकांच्या कल्याणासाठी जीवनभर झिजणारया राजर्षी शाहू महाराजांचा जन्म 26 जून 1874 रोजी झाला. 17 मार्च 1884 ला त्यांचे राज्यारोहण झाले. व दोन एप्रिल 1894 रोजी त्यांनी राज्यसुञे स्वीकारली. कोल्हापूर संस्थानाचा राज्यकारभार केवळ वीसाव्या वर्षीच छञपती राजर्षी शाहू महाराजांच्या हाती आला. पुढील अठ्ठावीस वर्ष त्यांनी राजसत्तेचा वापर तळागाळातील लोकांच्या कल्याणासाठी केला. ते आयुष्यभर दीनदुबळ्या, गोरगरीबांच्या हितासाठी झटत राहीले.
राजर्षी शाहू महाराजांनी शिक्षणाशिवाय बहूजनांचा विकास शक्य नाही म्हणून त्यावेळी  त्यांच्या संस्थानात प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे केले. समाजातील अगदी शेवटच्या घटकापर्यंत शिक्षणाचा प्रचार व प्रसार केला. सर्व जाती धर्मातील मुलांना शिक्षणाच्या सोयी उपल्ब्ध केल्या. खेड्यापाड्यातील गोरगरीब मुलांच्या शिक्षणा करीता शाळा व वस्तिगृहांची स्थापना केली. मुले - मुली, स्पृश्य व अस्पृश्य यांच्यासाठी त्यांनी त्या काळात एकञीत शाळा सुरू केल्या. आपली विधवा सून इंदूमती यांना शिक्षण देऊन तत्कालीन समाजाला स्ञी शिक्षणाचा मार्ग दाखवला. दीनदुबळ्यांच्या मुलांना उच्च शिक्षणासाठी परदेशात पाठवले. काळाची पावले ओळखून व्यवसाय शिक्षण, तंञशिक्षणाला प्रोत्साहन दिले. प्रशिक्षण केंद्रे सुरू केली. शेतीविषयक शिक्षणाला ही त्यांनी प्राधान्य दिले. व्यायाम शाळा सुरू केल्या. राजर्षी शाहू महाराजांनी शिक्षणाला बहूजन समाज उद्धारा चे साधन मानले.
समाजातील जातीयता मुळासकट उखडून टाकणे व एकजीनसी समाज निर्माण करणे त्यांच्या जीवनाचे ध्येय होते. म्हणूनच छञपती शाहू महाराजांनी आंतरजातीय विवाहांना चालना दिली. त्यावेळी त्यांनी असे अनेक विवाह घडवून आणले. व  जातीयतेच्या समूळ उच्चाटनाचे प्रयत्न केले. विधवा विवाहलाही त्यांनी प्रोत्साहन दिले. अंध रूढी , वाईट प्रथा कायद्याने बंद केल्या. म्हणूनच राजर्षी शाहू महाराजांना वास्तवादी व दृष्टे युग पुरूष म्हंटले जाते.
शेतीला पाणी मिळावे. शेतकऱ्यांचे जीवन सुधारावे यासाठी त्यांनी राधानगरी बंधारे बांधले. गोरगरीबांच्या हाताला काम मिळावे याकरीता शाहू मिलची स्थापना केली. भूमीहीन लोकांना रोजगार मिळावा म्हणून त्यांनी रोजगार हमी योजना सुरू केली. संस्थानात उद्योग व्यवसायाला प्रोत्‍साहन दिले.
राजर्षी शाहू महाराजांनी समता, स्वातंत्र्य, बंधुता, मानवता व सामाजिक न्यायची गुढी उभारली. बहूजन समाजाला विकासाची दिशा दिली. सामाजिक सुधारणा घडवून आणल्या. शिक्षणाच्या सोयी उपल्ब्ध केल्या. उद्योग व्यवसाय उभारले. राजसत्ता लोककल्याणासाठी राबवली. म्हणून त्यांना कर्ते समाज सुधारक, दृष्टे युग पुरूष व आदर्श लोकराजा म्हणून गौरवले जाते.
- देविदास कोरे  (लातूर)

मुख्याध्यापक

जयहिंद विद्यालय सिंदीजवळगा

ता. निलंगा  जि. लातूर

मो. - 97 30 32 5000

Email:  devidaskore21@gmail.com

22 June 2016




जयहिंद विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा
निलंगा :-
सिंदीजवळगा (ता. निलंगा) येथील जयहिंद विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्सहात साजरा करण्यात आला. सकाळी ७ ते ८ या वेळात सर्व विद्यार्थी व शिक्षकांनी योगाचे सर्व प्रकार केले. प्रशालेतील सहशिक्षक एच. जी. दिवे यांनी विद्यार्थ्यांना योग प्रकारा संदर्भात सविस्तर माहिती सांगून मार्गदर्शन केले. या प्रसंगी मुख्याध्यापक देविदास कोरे यांनीही विद्यार्थ्यांना उत्तम मानवी आरोग्यासाठी योगा किती महत्वाचा आहे. हे समजावून सांगितले. या वेळी  सर्व शिक्षक वविद्यार्थी उपस्थित होते.

20 June 2016

जयहिंद विद्यालयाचा १०० टक्के निकाल

निलंगा:-

माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने मार्च २०१६ मध्ये घेण्यात आलेल्या शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा सिंदीजवळगा ता. निलंगा येथील जयहिंद विद्यालयाचा निकाल १०० टक्के लागला आहे. विद्यालयातील भाग्यश्री अनिल शेळके हिने ८४.०० टक्के गुण घेऊन विद्यालयातून प्रथम येण्याचा मान मिळवला. तसेच दिव्या रंगराव  धुमाळ हि ८३.२० टक्के गुण घेवून शाळेतून द्वितीय व प्रदीप अशोक फावडे याने ७९.६० टक्के गुण घेवून तृतीय येण्याचा मान मिळवला. याबरोबरच दत्ता भिकाजी  हराळे याला ८९ टक्के तर गीता बालाजी धुमाळ हिला ७८.८० टक्के गुण मिळाले. विद्यालयातून विशेष प्राविण्यासह  सात , प्रथम श्रेणीत बावीस  व द्वितीय श्रेणीत सात तर तृतीय श्रेणीत दोन विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. शाळेने उज्ज्वल निकालाची परंपरा कायम राखली असून  यशस्वी विद्यार्थ्यांचे आभिनंदन संस्थेचे संस्थापक सचिव लांडगे गुरुजी, कार्याध्यक्ष वसंतराव पाटील, मुख्याध्यापक देविदास कोरे, पालक,शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी केले आहे.

12 May 2016

समाजातील सर्वच घटकांना समान शिक्षणाची संधी मिळावी

देशाच्या विकासात आणि पायाभरणीत शिक्षणाला अनन्य  साधारण महत्व  आहे. समाजाच्या सर्वांगीण विकास व प्रगतीसाठी शिक्षण  प्रभावी साधन आहे. म्हणून समाजातील सर्वच घटकांना समान शिक्षणाची संधी उपलब्ध असणे आवश्यक आहे. पण सध्याचे वास्तव यापेक्षा वेगळे  असून हे चित्र दुर्देवी आहे. शिक्षणामुळे या देशातील गरिबी ,दारिद्रय कमी होईल , विषमता नाहीशी होईल असे म्हंटले  जाते. पण स्वातंत्र्यानंतरच्या  साठ वर्षानंतरही हे सध्या झाले आहे का ? उलट गरिबी व दारिद्रयात भर पडत नाही का ? ही विषमता कमी होण्याऐवजी का वाढत आहे ? हे आज पर्यंतच्या शिक्षणाचे यश आहे की अपयश ? सर्वच क्षेत्राच्या मुळाशी शिक्षण असल्याने याचा गांभीर्याने विचार होणे आवश्यक आहे.

  • शिक्षणातील विषमता चिंताजनक:
     सहा ते चौदा वर्ष वयोगटातील सर्व मुलामुलींना सक्तीचे व मोफत शिक्षण देण्याची व्यवस्था शासनाने करणे बंधनकारक आहे. त्या नुसार शासनाने धोरणात्मक निर्णय घेऊन तशी सोय व कायदाही केला आहे.  वरील वयोगटातील मुलांच्या शिक्षणाची सोय करण्यावर सर्वशिक्षा अभियानाच्या माध्यमातून विशेष भर देण्यात येत आहे. या दृष्टीने शासनाचे व्यापक प्रयत्न सुरु आहेत. पण तरीही सध्याच्या शिक्षण व्यवस्थेत कमालीची विषम स्थिती दिसून येते. ही बाब चिंताजनक आहे.समाजातील सर्वच घटकांचा समान विकास घडून येण्यासाठी समान व सारख्या शाळातून दर्जेदार शिक्षणाची संधी मिळणे आवश्यक आहे. पण सध्याच्या शिक्षणात यापेक्षा वेगळे चित्र आढळते. सर्वसाधारण पणे शहरातील नगरपरिषदा , महनगरपालिकांच्या शाळांत दीनदलित , मजूर ,कामगार व गरिबांची मुले शिकताना आढळतात. तर ग्रामीण भागात शेतकरी , शेतमजुरांची मुले जिल्हापरीषदांच्या शाळांत बहुसखेने शिकताना दिसून येतात.शैक्षणिक वातावरणा आभावी दारिद्रय व गरिबीमुळे त्यांच्या शिक्षणाची हेळसांड होते. बिकट परिस्थितीमुळे ते महागड्या खाजगी शाळात , शहरात  जाऊन शिकू शकत नाहीत. त्यांना शिकवणी वर्ग लावणे ही शक्य होत नाही. याउलट धनिकांची मुल सर्व प्रकारच्या सुविधा असणाऱ्या शाळांत देणग्या देवून शिकताना आढळतात .त्यांना शिकवणी वर्ग  , शैक्षणिक साधने व सुख सुविधा आसतात. म्हणून त्यांना दर्जेदार शिक्षण मिळू शकते. डॉक्टर ,  इंजिनियर , वकील , प्राध्यापक व अन्य क्षेत्रात ते पुढे असतात. या स्पर्धेत काही अपवाद वगळता सर्वसामान्य गोरगरिबांची मुले तग धरू शकत नाहीत. त्यांच्या समोर अनेक प्रश्न असतात. त्यामुळे ते मागे पडतात. त्यामुळे गरीब अधिक गरीब तर धनिक अधिक धनिक बनतो. आणि विषमता कमी होण्या ऐवजी वाढते. म्हणून शिक्षणातील विषमता थांबवून समाजातील सर्व घटकांना समान व एकसारखे शिक्षण मिळणे आवश्यक आहे.
  • शहरी व ग्रामीण  भागातील दरी कमी व्हावी:
     शहरी  व ग्रामीण भागातील शिक्षणात काही प्रमाणात फरक दिसून येतो. शहरी भागात दर्जेदार शिक्षण मिळते. शैक्षणिक सुविधाही असतात. शिकवणीवर्गाची ही  सोय  असते. म्हणून ग्रामीण भागातील लोकांचा कल शहरी भागाकडे वाढताना दिसून येतो. त्यामुळे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. काही शाळा पुढे प्रवेशासाठी रांगा लागत आहेत , तर काही शाळा मुला अभावी ओस पडत आहेत. खेड्यातील शाळांना मुलांचा शोध घ्यावा लागत आहे. पालकांची मनधरणी  करून शिक्षकांना मुलांची जमवा जमवी करावी लागत आहे. आशी स्थिती का ? निर्माण होत आहे. याचे आत्मपरीक्षण शिक्षण क्षेत्रातील सर्वच घटकांनी करणे आवशक आहे.शहरातील पालक आपल्या पाल्यांच्या शिक्षणाविषयी अधिक जागरूक पणे लक्ष देताना दिसून येतात. त्यांना शैक्षणिक सुविधा व  साधणे ही पुरविली जतात. मुलांच्या अभ्यासाकडे  लक्ष्य दिले जाते. पण खेड्यात मात्र या पेक्षा वेगळी स्थिती आढळते. खेड्यातील पालक मुलांच्या शिक्षणाविषयी फारसे जागरूक दिसत नाहीत.मुलांत ही शिक्षणाविषयी गांभीर्य आढळत नाही. शहरांच्या तुलनेत शैक्षणिक सुविधांचा ही आभाव जाणवतो. खाजगी शिकवणीवर्ग ही  नसतात. बरयाचदा पालक मुलामुलींना घरगुती व मजूराअभावी  शेतातील कामे लावताना दिसून येतात. त्यामुळे शाळेतील उपस्थितीचे प्रमाण कमी होते. त्यांचा प्राथमिक शिक्षणाचा पायाही कच्चा असतो. त्यामुळे ग्रामीण भागातील शैक्षणिक दर्जा व निकाल खालावताना आढळतो.पालकांची मुलांच्या शिक्षणाविषयी असणारी उदासिनता. व शिक्षणाकडे पहाण्याची मानसिकता तसेच बहुसंख्य पालकांचा आडणीपणा यामुळे ग्रामीण भागात शिक्षणासंबंधी अनेक प्रश्न व समस्या  निर्माण होत आहेत. त्यामुळे शहरी व ग्रामीण भागात शिक्षणात तफावत व फरक दिसून येतो. तो कमी करण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे.ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देऊन दर्जेदार शिक्षण देण्याची आवश्यकता आहे. तरच पालकांचा शहराकडे शिक्षणासाठी वाढणारा कल कांही अंशी कमी होईल. देशातील वाढती गरिबी व विषमता कमी करण्यासाठी समाजातील सर्व घटकांना , तळागाळातील दीनदलित कामगार व गोरगरीबांच्या मुलामुलींना सारख्या व समान शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली तरच समाजातील सर्व स्तरातील लोकांचा सारख्या प्रमाणात विकास होऊ शकेल व शैक्षणिक विषमता कमी होण्यास मदत होईल.
- देविदास कोरे  (लातूर)
मो. न - 97 30 32 5000
Email: devidaskore21@gamil.com.

09 September 2014

क्रिकेट सारख्या खेळातून समंजस व सांघिक भावना विकसित होते - देविदास कोरे

निलंगा:-
शालेय जीवनात खेळाला अनन्य साधारण महत्व असून क्रिकेट सारख्या खेळातून विद्यार्थ्यांमध्ये खिलाडू वृत्ती बरोबरच समंजस व सांघिक भावनेचा विकास होण्यास मदत होऊ शकते असे मत मुख्याध्यापक देविदास कोरे यांनी व्यक्त केले. सिंदीजवळगा ता. निलंगा येथील जयहिंद विद्यालयाच्या भव्य क्रीडामैदानावर निलंगा तालुकास्तरीय शालेय क्रिकेट स्पर्धांचे उद्घाटन ता. नऊ मंगळवार रोजी सकाळी ठीक अकरा वाजता मुख्याध्यापक देविदास कोरे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी आयोजित कार्यक्रमात तालुक्यातील विविध शाळातून क्रिकेट स्पर्धेसाठी सहभागी झालेल्या खेळाडूंना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
या उद्घाटन कार्यक्रमासाठी प्रमुख पाहूणे म्हणून रामेगावचे माजी चेअरमन शिवाजी शेळके, सुरेश धुमाळ, सी. व्ही. चव्हाण, एस. व्ही. शिंदे, एन. ए. सय्यद, आर. पी. तेलंग, जी. जी. जाधव, राहूल क्षीरसागर, एस. व्ही. तारे आदी आदी उपस्थित होते.कार्यक्रमाच्या प्रस्ताविकात तालूका क्रीडा संयोजक एस. व्ही. शिंदे यांनी निलंगा तालुकास्तरीय शालेय क्रिकेट व मैदानी स्पर्धेचे ठिकाण जयहिंद विद्यालय हे असल्याचे सांगून १६ व १९ वर्षे वयोगटातील शालेय क्रिकेट स्पर्धा अनुक्रमे ता. दहा व अकरा सप्टेंबर तर मैदानी स्पर्धा २२ व २३ सप्टेंबरला होणार असल्याची माहिती दिली व तालुक्यातील जास्तीत जास्त शाळांनी या स्पर्धांत सहभागी होण्याचे आव्हान केले.
आज पार पडलेल्या १४ वर्षे वयोगटातील शालेय क्रिकेट स्पर्धेत जेवरी येथील जि. प. प्रा. शाळा, निलंगा येथील शिवाजी विद्यालय, प्रतिभाताई पवार आश्रम शाळा, सिंदीजवळगा येथील जयहिंद विद्यालय, व जाजनुर येथील जि. प. प्रा. शाळाच्या संघांनी सहभाग नोंदवला. या स्पर्धांसाठी पंच म्हणून एस. व्ही. तारे, एस. व्ही. शिंदे एम. टी. जाधव काम पहात असून स्पर्धा यशस्वीतेसाठी एस. बी. परिहार, एस. व्ही, पवार, एस, व्ही. तारे, आष्ठुरे सर परिश्रम घेत आहेत.

18 August 2014

शालेय योगा विभागीय क्रीडा स्पर्धेसाठी सुमित माने याची निवड

निलंगा :-
लातूर जिल्हा विभागीय क्रीडा कार्यालयाच्या वतीने सन २०१४ - १५  या शेक्षणिक वर्षात क्रीडा संकुल येथे नुकत्याच घेण्यात आलेल्या १४ वर्ष वयोगटातील जिल्हास्तरीय शालेय योगा क्रीडा स्पर्धेत सिंदीजवळगा ता. निलंगा येथील जयहिंद विद्यालयात इयत्ता आठवीत शिकत असलेला विद्यार्थी  सुमित समिंदर माने याने लातूर जिल्हास्तरीय शालेय योगा स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला असून त्याची निवड विभागीय स्पर्धेसाठी झाली आहे. त्याबद्दल विद्यालयाचे मुख्याध्यापक देविदास कोरे सहशिक्षक एस. बी. परिहार, एस. व्ही. पवार क्रीडा शिक्षक एस. व्ही. तारे यांनी त्याचे आभिनंदन केले आहे.

10 August 2014

राज्यघटनेत असलेल्या पण त्याची अंमलबजावणी केली जात नसलेल्या धनगरांच्या आरक्षणा संदर्भात कांही प्रश्न

नगर समाज आरक्षण अंमलबजावणी संदर्भात गेल्या अनेक दिवसांपासून राज्यभरात विविध मार्गांनी तीव्र आंदोलन करत आहे. पण सुस्त व सत्तेत मदमस्त असलेल्या सरकारकडून आरकक्षणाचा निर्णय चालढकल करून विलंब केला जात आहे त्या अनुषंगाने खालील प्रश्न निर्माण झाले असून या तीव्र प्रश्नांची सरकारकडूनत्वरीत उकल होऊन धनगर समाजाला न्याय मिळणे आवश्यक आहे.
०१) राज्य घटनेत धनगर - धनगड  समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण असूनही गेल्या ६७ वर्षा      पासून र आणि ड चा शाब्दिक घोळ घालून त्याची अंमलबजावणी सरकार कडून का करण्यात आली नाही…?
०२) देशातील अन्य राज्यांनी एस. टी. आरक्षणाची आमलबजावणी करून धनगरांना न्याय दिला असताना पुरोगामीतत्वाचा टेंभा मिरवणाऱ्या महाराष्ट्रात मात्र राज्यघतनेतील हाकाच्या आरक्षणा पासून धनगराना आजतागायत का…?  वंचित ठेवले आहे…?
०३) अज्ञानी जंगलात व रानावनात भटकंती करीत फिरणाऱ्या भोळ्या भाबड्या मुळ आदिवासी  धनगर समाजाला  फसवण्याचं हे षड्यंत्र नव्हे का …?
०४) परम पुज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटनेत मुळ आदिवासी धनगर समाजाचा समावेश अनुसूचित जमातीत केलेला असूनही राज्यसरकार त्याच्या अंमलबजावणीची शिफारस केंद्र सरकारकडे का करत नाही…?
०५) हाक्काच्या आरक्षणा पासून धनगरांना वंचित ठेवण्याचे पातक सरकार का….? करत आहे…?
०६) आरक्षणा अभावी धनगरांच्या अनेक पिढ्या आजपर्यंत बरबाद झाल्या. त्याला कोण जबाबदार आहे…?
०७) सत्ता वंचितांना न्याय देण्यासाठी असते का….? का त्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहण्यासाठी असते…?
०८) न्याय व सनदशीर मार्गाने हे आंदोलन व लढा गेल्या ६७ वर्षापासून सुरु आहे. पण साधी न्याय मागणीही का मान्य केली जात नाही... ?
०९) गेल्या  ६७ वर्षापासून हा अन्याय होत असूनही तो आज पर्यंत मूकपणे धनगर समाजाने सहन केला हा संयम व ही सहनशिलता नव्हे का ….?
१०) या समाजाकडून आणखी किती संयम व सहनसिलता अपेक्षित आहे…?
११) लाखो धनगर समाजबांधवांनी पंढरपूर ते बारामती शांततेत व सनदशीर मार्गाने पदयात्रा काढली. सरकारचे लक्ष्य   वेधले….?
१२) अमरण नऊ  दिवसांचे उपोषण करण्यात आले. पण उपोशनकर्त्यांना भेटायला सरकारच्या कोणत्याही मंत्र्याना वेळ का ….? मिळाला नाही.…?
१३) चक्री उपोषण झाले अनेकांची तबीयत बिघडली  पण सरकारला त्याचीही साधी दाखल घ्यावीशी का…? वाटली नाही….?
१४) आख्खा महाराष्ट्र या आंदोलनाने ढवळून निघाला आहे. स्वातंत्र्या नंतर हा समाज पूर्णता एकवटला असून त्यांना आपल्याला न्याय हक्कापासून वंचित ठेवल्याची जाणीव झाली आहे. सर्वत्र हे आंदोलन सनदशीर मार्गाने  सुरु असतानाही सरकार वेळकाढू पणा का करत आहे ….? धनगरांच्या न्याय मागणीकडे गांभीर्याने का पाहिले जात नाही…?
१३) धनगरांचा राज्य घटनेत एस. टी. प्रवर्गात समावेश असूनही  गेल्या ६७ वर्षापासून त्याच्या आमलबजावणी ची मागणी जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवण्याचे कटकारस्थान का…?  केले जात आहे…?
१५) घटनेत नसलेले आरक्षण सरकार देऊ शेकते तर मग राज्यघटनेने दिलेल्या आरक्षणाची अंमलबाजावणी  करण्याची शिफारस सरकार का…? करत नाही….?
१६) धनगर समजाच्या आरक्षण अंमलबजावणी संदर्भात हा दुजाभाव नाही का….? सरकार आशी सापत्नभूमिका का घेत आहे….?
१७) जंगलात व रानावनात भटकंती करणारा धनगर समाज मुळातच सरळमार्गी, संयमी व सहनशील  आहे. हा आज पर्यंतचा इतिहास असून तसी नोंद इंग्रजांनी ग्याझेट  मध्ये सुद्धा केलेली असताना या समाजाच्या शांततामय आंदोलनाला गालबोट लावून तमाम धनगर बांधवांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक का केला जात आहे...?
१८) धनगर  व आमच्या आदिवासी बांधवांत बुद्धिभेद व तेढ निर्माण करण्याचे  कुटील षड्यंत्र, कपट कारस्थान  व महा कुंभाड रचून हे आंदोलन दडपण्याचे प्रयत्न का केला जात आहे….?               
सरकारने या संदर्भात लवकर निर्णय न घेता हा प्रश्न असाच ताटकळत, तापवत ठेवला व त्यामुळे तीव्र उद्रेकातून अप्रिय घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण असणार आहे…?
कांही नगण्य अप्रिय अपवाद वगळता आजपर्यंत धनगर समाजाचे हे आंदोलन शांततामय व सनदशीर  मार्गानेच झाले आहे.राज्यघटनेने दिलेल्या न्याय हक्काची मागणी मान्य होई पर्यंत हे आंदोलन सुरु ठेवावे पण त्याला गालबोट लागणार नाही याची दक्षता घ्यावी.
- देविदास कोरे ( लातूर )
मो - 97 30 32 5000
Email : devidaskore21@gmail.com

धनगराना आरक्षण नाकारणे हा राज्यघटनेशी द्रोह

नगर जमातीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटनेत अनुसूचित जमातीचे आरक्षण दिलेले आहे. जातीयवादी सरकार आकस व सूडबुद्धीने गेल्या साठ पासष्ठ वर्षापासून धनगर जमातीवर सातत्याने अन्याय करत आहे. हि अत्यंत निषेधार्य बाब आहे. याबाबत अनु. जमाती मंत्रालयाच्या 2008-09 च्या वार्षिक अहवालातील अनु. जमातीची इंग्रजी यादी पाहू. छत्तीसगढ-(33) oran, dhanka, dhangad, गुजरात-(24) rabari, हिमाचलप्रदेश-(2) gaddi, जम्मू-काश्मीर-(10) bakkarwal, झारखंड-(25) oran, dhangar (oraon), कर्नाटक-(28) kuruba, केरळ- (18) kurumbar, kurumban, मध्यप्रदेश-(35) oraon, dhanka, dhangad, महाराष्ट्र-(36) oraon, dhangad, ओडिसा-(53) oraon, dhangar, uran. आता याच अहवालाच्या हिंदी भाषांतरामध्ये dhangad हा शब्द कसा लिहिला आहे ते पाहू.
  • झारखंड-उरांव, धनगर, ओरांव; मध्यप्रदेश-ओरान, धांका, धंगाद;
  • महाराष्ट्र-ओरान, धनगर; ओडिसा-ओरांव, धनगर, उरान. यावरुन dhangad या इंग्रजी शब्दाचे मराठी किंवा हिंदी रुप धनगर असल्याचे स्पष्ट होते.
  • याव्यतिरिक्त धनगर हे विविध राज्यात वेगवेगळ्या नावानी ओळखले जातात.
  • उदा. गुजरात-रबारी, हि. प्रदेश-गड्डी, महाराष्ट्र, म. प्रदेश, ओडिसा, झारखंड, उ.प्रदेश- धनगर, कर्नाटक, आं.प्रदेश, तमिळनाडू, केरळ-कुरुब, कुरुम्बर. या सर्व जमातींचा समावेश त्या-त्या राज्यात अनु.जमातीत आहे. या सर्व जमातींचा व्यवसाय, दैवते, चालीरिती, परंपरा या समान आहेत. धनगरी ओव्या, गजी न्रुत्य, मेंढपाळ व्यवसाय हे समान धागे आढळतात. अगदी या विविध नावानी गुगल सर्च केले तरी या सर्व जाती धनगर (shepherd) असल्याचे दिसेल.
विविध घटनात्मक यंत्रणानीही वेळोवेळी धनगर आणि धनगड एकच असल्याचे अभिप्राय दिले आहेत. १९३१ मध्ये ब्रिटीश सरकारने केलेल्या जातनिहाय जन गणनेमध्ये 'ओरान' या जमातीची समकक्ष जमात म्हणून धनगर जमातीचा उल्लेख केला आहे. १९६८ साली केंद्र सरकारने प्रसिद्ध केलेल्या Bibliography of SC, ST & marginal tribes (पृष्ठ क्र. २९४) वर 'धनगर' (धनगड नव्हे) अनुसूचित जमात आहे असे नमूद केले आहे. १९८२ साली प्रसिद्ध केलेल्या याच ग्रंथाच्या आवृत्तीत 'धनगर' अशीच नोंद आहे. केंद्र सरकारच्या १९६१ च्या जनगणना अहवालात धनगर जमात अनुसूचित जमातीत समाविष्ठ असल्याचे म्हटले आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाने २००९ साली दिलेल्या निकालात म्हटले आहे, "धनगर हि उत्तरप्रदेश, बिहार आणि पश्चिम बंगाल मध्ये अनुसूचित जातीत मोडते तर महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशमध्ये त्यांचा समावेश अनुसूचित जमातीत आहे." राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाने धनगर आणि धनगड एकच असल्याचे मान्य केले आहे. (Minutes of 29th meeting of NCSC, ३/१२/२०१२). या सर्व बाबी पहाता धनगर आणि धनगड एकच असल्याचे दिसते.
  तरीही केवळ तांत्रिक दोषाचा बाऊ करुन आजपर्यंत धनगर समाजाला अनु. जमातीच्या सवलतींपासून वंचित ठेवले गेले. घटनेने धनगराना दिलेल्या सवलतींपासून त्याना वंचित ठेवणे म्हणजे घटनेशी द्रोह करणे होय.
- देविदास कोरे (लातूर )
मो - 97 30 32 5000
Email: devidaskore21@gmail.com