पहा नवीन अपडेट

शैक्षणिक लेख व अन्य माहिती पूर्ण आशा शैक्षणिक ब्लॉगवर आपले मन:पूर्वक स्वागत.

27 June 2016

देविदास कोरे यांची मराठी विषय विभागीय कार्यशाळेसाठी निवड

Devidas Kore Pasport Calar Fotho.jpg


निलंगा:-                                                                                                                        

शासनाच्या प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत  दिनांक २९ व ३० जून २०१६ या कालावधीत औरंगाबाद येथे होण्याऱ्या दोन दिवसीय विभागीय मराठी विषयाच्या कार्यशाळेसाठी लातूर जिल्ह्यातून सिंदीजवळगा ता. निलंगा येथील जयहिंद विद्यालयाचे मुख्याध्यापक देविदास कोरे यांची निवड झाली आहे.जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, वैजापूर जि. औरंगाबाद या संस्थेमार्फत प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत विभागीय स्तरावर मराठी विषयाची ही दोन दिवसीय निवासी कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. त्यात लातूर जिल्ह्यातून देविदास कोरे यांची निवड झाल्याबद्दल श्री. शामागीर शिक्षण संस्थेचे सचिव ए. आर. लांडगे गुरुजी, कार्याध्यक्ष वसंतराव पाटील, मराठवाडा मुख्याध्यापक संघाचे सचिव दिलीपराव धुमाळ, लातूर विभागीय मंडळाचे माजी सदस्य तानाजी पाटील, निलंगा तालूका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष ज्ञानदेव बरमदे, सचिव अजय मोरे, डॉ. राजेश्वर पाटील, मुख्याध्यापक एस. एन. शिरमाळे, संजय कदम, पी. आर. रेड्डी, एच. बी. दिवे, एस. बी. परिहार यांनी या निवडीबद्दल अभिनंदन करून कार्यशाळेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

23 June 2016

बहूजन उद्धारक : राजर्षी शाहू महाराज



इतिहासात अनेक राजे झाले पण जनतेच्या ह्दयावर अधिराज्य करणारे राजे बोटावर मोजण्याइतकेच झाले. त्यामध्ये राजर्षी शाहू महाराज अग्रस्थानी आहेत. ' बहूजन हित व बहूजन सुख'  या करीता आपली राजसत्ता राबवणारा लोककल्याणकारी राजा म्हणूनही  त्यांचा उल्लेख केला जातो.
छञपती शाहू महाराज जनतेचे राजे होते. ते जसे मानवतेचे उपासक होते तसे गरीबांचे उद्धारकही होते. राजर्षी शाहू समंजस व दृष्टे युगपुरुष होते. म्हणून राजा कसा असावा ? तर तो शाहू महाराजांसारखा असावा असे म्हंटले जाते. लोकांच्या कल्याणासाठी जीवनभर झिजणारया राजर्षी शाहू महाराजांचा जन्म 26 जून 1874 रोजी झाला. 17 मार्च 1884 ला त्यांचे राज्यारोहण झाले. व दोन एप्रिल 1894 रोजी त्यांनी राज्यसुञे स्वीकारली. कोल्हापूर संस्थानाचा राज्यकारभार केवळ वीसाव्या वर्षीच छञपती राजर्षी शाहू महाराजांच्या हाती आला. पुढील अठ्ठावीस वर्ष त्यांनी राजसत्तेचा वापर तळागाळातील लोकांच्या कल्याणासाठी केला. ते आयुष्यभर दीनदुबळ्या, गोरगरीबांच्या हितासाठी झटत राहीले.
राजर्षी शाहू महाराजांनी शिक्षणाशिवाय बहूजनांचा विकास शक्य नाही म्हणून त्यावेळी  त्यांच्या संस्थानात प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे केले. समाजातील अगदी शेवटच्या घटकापर्यंत शिक्षणाचा प्रचार व प्रसार केला. सर्व जाती धर्मातील मुलांना शिक्षणाच्या सोयी उपल्ब्ध केल्या. खेड्यापाड्यातील गोरगरीब मुलांच्या शिक्षणा करीता शाळा व वस्तिगृहांची स्थापना केली. मुले - मुली, स्पृश्य व अस्पृश्य यांच्यासाठी त्यांनी त्या काळात एकञीत शाळा सुरू केल्या. आपली विधवा सून इंदूमती यांना शिक्षण देऊन तत्कालीन समाजाला स्ञी शिक्षणाचा मार्ग दाखवला. दीनदुबळ्यांच्या मुलांना उच्च शिक्षणासाठी परदेशात पाठवले. काळाची पावले ओळखून व्यवसाय शिक्षण, तंञशिक्षणाला प्रोत्साहन दिले. प्रशिक्षण केंद्रे सुरू केली. शेतीविषयक शिक्षणाला ही त्यांनी प्राधान्य दिले. व्यायाम शाळा सुरू केल्या. राजर्षी शाहू महाराजांनी शिक्षणाला बहूजन समाज उद्धारा चे साधन मानले.
समाजातील जातीयता मुळासकट उखडून टाकणे व एकजीनसी समाज निर्माण करणे त्यांच्या जीवनाचे ध्येय होते. म्हणूनच छञपती शाहू महाराजांनी आंतरजातीय विवाहांना चालना दिली. त्यावेळी त्यांनी असे अनेक विवाह घडवून आणले. व  जातीयतेच्या समूळ उच्चाटनाचे प्रयत्न केले. विधवा विवाहलाही त्यांनी प्रोत्साहन दिले. अंध रूढी , वाईट प्रथा कायद्याने बंद केल्या. म्हणूनच राजर्षी शाहू महाराजांना वास्तवादी व दृष्टे युग पुरूष म्हंटले जाते.
शेतीला पाणी मिळावे. शेतकऱ्यांचे जीवन सुधारावे यासाठी त्यांनी राधानगरी बंधारे बांधले. गोरगरीबांच्या हाताला काम मिळावे याकरीता शाहू मिलची स्थापना केली. भूमीहीन लोकांना रोजगार मिळावा म्हणून त्यांनी रोजगार हमी योजना सुरू केली. संस्थानात उद्योग व्यवसायाला प्रोत्‍साहन दिले.
राजर्षी शाहू महाराजांनी समता, स्वातंत्र्य, बंधुता, मानवता व सामाजिक न्यायची गुढी उभारली. बहूजन समाजाला विकासाची दिशा दिली. सामाजिक सुधारणा घडवून आणल्या. शिक्षणाच्या सोयी उपल्ब्ध केल्या. उद्योग व्यवसाय उभारले. राजसत्ता लोककल्याणासाठी राबवली. म्हणून त्यांना कर्ते समाज सुधारक, दृष्टे युग पुरूष व आदर्श लोकराजा म्हणून गौरवले जाते.
- देविदास कोरे  (लातूर)

मुख्याध्यापक

जयहिंद विद्यालय सिंदीजवळगा

ता. निलंगा  जि. लातूर

मो. - 97 30 32 5000

Email:  devidaskore21@gmail.com

22 June 2016




जयहिंद विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा
निलंगा :-
सिंदीजवळगा (ता. निलंगा) येथील जयहिंद विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्सहात साजरा करण्यात आला. सकाळी ७ ते ८ या वेळात सर्व विद्यार्थी व शिक्षकांनी योगाचे सर्व प्रकार केले. प्रशालेतील सहशिक्षक एच. जी. दिवे यांनी विद्यार्थ्यांना योग प्रकारा संदर्भात सविस्तर माहिती सांगून मार्गदर्शन केले. या प्रसंगी मुख्याध्यापक देविदास कोरे यांनीही विद्यार्थ्यांना उत्तम मानवी आरोग्यासाठी योगा किती महत्वाचा आहे. हे समजावून सांगितले. या वेळी  सर्व शिक्षक वविद्यार्थी उपस्थित होते.

20 June 2016

जयहिंद विद्यालयाचा १०० टक्के निकाल

निलंगा:-

माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने मार्च २०१६ मध्ये घेण्यात आलेल्या शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा सिंदीजवळगा ता. निलंगा येथील जयहिंद विद्यालयाचा निकाल १०० टक्के लागला आहे. विद्यालयातील भाग्यश्री अनिल शेळके हिने ८४.०० टक्के गुण घेऊन विद्यालयातून प्रथम येण्याचा मान मिळवला. तसेच दिव्या रंगराव  धुमाळ हि ८३.२० टक्के गुण घेवून शाळेतून द्वितीय व प्रदीप अशोक फावडे याने ७९.६० टक्के गुण घेवून तृतीय येण्याचा मान मिळवला. याबरोबरच दत्ता भिकाजी  हराळे याला ८९ टक्के तर गीता बालाजी धुमाळ हिला ७८.८० टक्के गुण मिळाले. विद्यालयातून विशेष प्राविण्यासह  सात , प्रथम श्रेणीत बावीस  व द्वितीय श्रेणीत सात तर तृतीय श्रेणीत दोन विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. शाळेने उज्ज्वल निकालाची परंपरा कायम राखली असून  यशस्वी विद्यार्थ्यांचे आभिनंदन संस्थेचे संस्थापक सचिव लांडगे गुरुजी, कार्याध्यक्ष वसंतराव पाटील, मुख्याध्यापक देविदास कोरे, पालक,शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी केले आहे.