पहा नवीन अपडेट

शैक्षणिक लेख व अन्य माहिती पूर्ण आशा शैक्षणिक ब्लॉगवर आपले मन:पूर्वक स्वागत.

12 February 2014

जयहिंद विद्यालय सिंदीजवळगा येथे स्काऊट गाईड जिल्हा मेळावा संपन्न

भारत स्काऊट गाईड लातूर जिल्हा कार्यालय व जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीने आयोजित कब- बुलबुल व स्काऊट गाईड जिल्हा मेळावा आठ ते दहा फेबुरवारी दरम्यान सिंदीजवळगा ता. निलंगा येथील जयहिंद विद्यालयात संपन्न झाला. जिल्ह्यातील विविध तालुक्यातून सहभागी झालेल्या ४७ कब बुलबुल व स्काऊट गाईड संघाचे सुमारे एक हजार ते बाराशे विधार्थ्यांनसह स्काऊट गाईड शिक्षकांचे शनिवार दि. आठ फेबु रोजी सकाळी ११:०० वाजता जयहिंद विद्यालयाच्या भव्य प्रांगणात आगमन होऊन संघ नोंदणी, तंबू उभारणी, व उद्घाटन कार्यक्रमाचा सराव झाला.                                
जिल्हा मेळाव्याचे उद्घाटन नऊ फेबु रोजी सकाळी ११:०० वाजता कोषाध्यक्ष महराष्ट्र राज्य भारत स्काऊट गाईड संघ मुंबई येथील बी. सी. हंगे यांच्या हस्ते झाले. यावेळी झालेल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष लातूर येथील महाराष्ट्र राज्य विभागीय मंडळाचे सदस्य तानाजी पाटील हे होते.प्रमुख पाहुणे म्हणून लातूर विभागाचे विभाग प्रमुख सुभाष डुकरे, लातूर जिल्हा संघटन आयुक्त गोविंद केंद्रे, उस्मनाबाद जिल्हा संघटन आयुक्त इरले, परभणी स्काऊट गाईडचे जिल्हा चिटणीस सुधाकर आंदोले, लातूर स्काऊट गाईडचे जिल्हा चिटणीस चंद्रकात साळुंके, लातूर जिल्हा मुख्यालय आयुक्त एल. एम. डुरे, श्रीमती जोती मंगलगे उपाध्यक्षा श्रीमती सुमित्रा सुडे, सुनिता आरळीकर, लातूर जिल्हा स्काऊट गाईडचे कोषाध्यक्ष ए. बी. बिडवे, सहायक जिल्हा आयुक्त एस. एन. सिरमाळे, सिंदीजवळग्याच्या सरपंच हिरकणबाई घोलप, माजी सरपंच गोविंद सिरसले, रामेगावचे माजी चेरमण शिवाजी शेळके, मुख्याध्यापक राजेश्वर पाटील, पांडुरंग रेड्डी, अभिमन्यू गट्टे, दवनगिरे सर, सय्यद सर, श्रीमती पाटील मडम, निलंगा तालुका क्रीडा प्रमुख शिंदे सर, स्काऊट गाईड जिल्हा मेळावा आयोजन समिती प्रमुख तथा जयहिंद विद्यालयाचे मुख्याध्यापक देविदास कोरे आदी मान्यवर उपस्थित होते. सर्वांचे शाल श्रीफळ हार व गुलाब पुष्प देऊन विद्यालयाच्या वतीने स्वागत सत्कार करण्यात आला.    
कार्यक्रमाच्या सुरवातीला मान्यवरांना स्काऊट गाईड पथकाने संचालन करून मानवंदना दिली. यावेळी कांही सांस्कृतिक गीत व न्रत्यांचेही सादरीकरण औसा येथील मुक्तेश्वर विद्यालय, लातूर येथील गोदावरीदेवी कन्या विद्यालय, तळीखेड येथील जिल्हा परिषद प्रशाला व अहमदपूर येथील विमलबाई देशमुख विद्यालयाच्या संघांनी केले.
लातूर जिल्हा संघटन आयुक्त गोविंद केंद्रे यांनी प्रास्ताविकपर मनोगतात मागील मेळाव्यांचा मागोवा घेऊन या मेळाव्यात सभागी झालेल्या सर्व स्काऊटर्सना जयहिंद विद्यालय प्रशासनाने आवशक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल आभार व्यक्त केले. मेळावा आयोजन समिती प्रमुख देविदास कोरे यांनी हा जिल्हा मेळावा घेण्याचा योग शाळेला लाभल्याबद्दल समाधान व्यक्त करून केवळ चारपाच दिवसात या मेळाव्याची तयारी केल्याचे सांगितले व सर्व सहभागी शाळांच्या स्काऊट गाईड संघाना मेळाव्याच्या सुभेछा दिल्या. बी. सी. हंगे  कोषाध्यक्ष महराष्ट्र राज्य भारत स्काऊट गाईड संघ मुंबई हे आपल्या मनोगतात म्हणाले, “ स्काऊट गाईड ही संस्काराची चळवळ असून आडीआडचणीना कसं सामोरं जायचं याचा वस्तूपाठच या माध्यमातून विद्यार्थ्यांना मिळतो. पुस्तकी ज्ञानापेक्षा रानावनात स्वतः तंबू उभारून तीन दिवस येथे राहत असताना येणारे अनुभव प्रत्यक्ष वास्तव जीवनाची ओळख करून देणारे असतात. आपण वेगवेगळ्या ठिकाणाहून येथे एकत्र येऊन मिळूनमिसळून राहत असतो आणि त्यातून एकोपा जपला जातो हे अत्यंत म्हत्वाचे आहे.”
अध्यक्षीय मनोगतात विभागीय मंडळाचे सदस्य तानाजी पाटील म्हणाले, “ या मेळाव्यात मुलींची संख्या लक्षणीय असून ही अभिनंदनीय बाब आहे. वेगवेगळ्या शाळांच्या स्काऊट गाईड संघांनी जे गीत व न्रत्य सादर केले ते खरोखरच वाखंण्यायोग्य आहे. आपल्यातील सुप्त कलागुणांना आशा मेळाव्यातून वाव मिळतो व आपला सर्वांगीण विकास साध्य होऊ शकतो. मेळाव्यात ज्या वेगवेगळ्या स्पर्धा घेतल्या जातात त्यातूनही प्रेरणा व स्फूर्ती मिळते.” कार्यक्रमाचे सूत्र संचालन व आभार प्रदर्शन गिरी सर यांनी केले या कार्यक्रमास मेळाव्यासाठी जिल्ह्यातील वेगवेगळ्या शाळातून आलेले सुमारे बाराशे विद्यार्थी स्काऊट गाईड शिक्षक व  गावकरी उपस्थित होते.
नऊ फेबु रोजी सायंकाळी ठीक सात वाजता जयहिंद विद्यालयाच्या प्रांगणात भव्य शेकोटी कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाचे उद्घाटन शेकोटी पेटूवून भारत स्काऊट गाईडचे राष्ट्रीय आयुक्त भा.ई.नागराळे (दिल्ली) व लातूर जिल्हा मुख्य आयुक्त वसंतराव पाटील यांच्या हस्ते झाले. या वेळी विभागीय आयुक्त सुभाष बोथिकर सिंदीजवळगा येथील उपसरपंच दिवाकर सिरसले, शिवाजी शेळके, लिंबराज मगर, मुख्याध्यापक देविदास कोरे आदी मान्यवर उपस्थित होते. जयहिंद विद्यालयातील स्काऊट गाईड च्या मुलीनी हातात ज्योत घेऊन ज्योत से ज्योत जगावो हा नयनरम्य देखावा गीत सादर केले.
या प्रसंगी मनोगत व्यक्त करताना राष्ट्रीय आयुक्त भा. ई. नागराळे म्हणाले, “ या मेळाव्यातील स्काऊट गाईडरसचा उत्साह पाहून मी आनंदी झालो असून या ठिकाणी सुरु असलेले सांस्कृतिक कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या स्पर्धा या सर्वांनी इथले वातावरण भारावून गेले आहे. मला राष्ट्रीय आयुक्त म्हणून वेगवेगळ्या राज्यात फिरण्याचा योग येतो पण लातूरचं डोळ्यात भरणारं वेगळेपण मात्र जाणवतं असे गोरवोद्गार काढून ते म्हणाले, “ स्काऊट गाईड मधून स्वत्वाची जाणीव विकसित होते त्याच बरोबर काटकसर, सहास,राष्ट्रीय एकात्मता, श्रम प्रतिष्ठा, सांघिक भावना आदी मुल्यांचा संस्कार आपल्या मनावर होतो. म्हणून स्काऊट गाईड ही चळवळ जात,धर्म,भाषा या पलीकडे जाऊन माणूसकीची शिकवण देणारी आहे. ती जगातील अनेक देशात सक्रिय पणे कार्यरत आहे.” या नंतर मेळाव्यात सहभागी ४७ संघांच्या गीत व न्रत्यांच्या सांस्कृतिक स्पर्धा घेण्यात आल्या या कार्यक्रमासाठी  विद्यार्थांनसह रामेगाव व सिंदीजवळगा येथील अबालवृद्ध उपस्थित होते.
सोमवार दिनांक दहा फेबु रोजी सकाळी नऊ वाजता सिंदीजवळगा येथे भव्य जनजागृती व शोभायात्रा काढण्यात आली.गावातील पदाधिकारी जेष्ठ नागरिक व अनेक मान्यवर यात सहभागी झाले होते.त्यात पर्यावरण संरक्षण, मुलींचे शिक्षण, या बरोबरच विवेकानंद, शिवाजी महाराज, सावित्रीबाई फुले या व अन्य महापुरूषाच्या वेशभूषा परिधान  करून या जनजागृती फेरीत सुमारे बाराशे विद्यार्थांनी आपला सहभाग नोंदवला.
या नंतर दुपारी एक वाजता समारोप व बक्षीस वितरण कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लातूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दतात्रय बनसोडे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून माध्यमिक शिक्षणाधिकारी भाऊसाहेब तुपे, स्काऊट गाईडचे जिल्हा चिटणीस चंद्रकांत साळुंखे, कोषाध्यक्ष ए.बी. बिडवे, सह्यक सचिव दिलीप धुमाळ, जिल्हा संघटन आयुक्त गोविंद केंद्रे, विभागीय आयुक्त सुभाष बोथिकर, मुख्याध्यापक देविदास कोरे शिवाजी शेळके, सरपंच घोलप आदी मान्यवर व्यास्पीठावर उपस्थित होते.कार्यक्रमाच्या सुरवातीला मान्यवरांना स्काऊट गाईड पथकाने संचालन करून मानवंदना दिली. यावेळीही  कांही सांस्कृतिक गीत व न्रत्यांचे विद्यार्थांनी सादरीकरण केले. स्काऊट गाईड कार्यालय व शाळेचा वतीने मान्यवरांचा शाल,श्रीफळ, हार व स्काऊटचा स्कार्फ घालून सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा संघटन आयुक्त गोविंद केंद्रे यांनी केले. या मेळाव्यात विद्यार्थ्यांच्या घेण्यात आलेल्या तंबू सजावट, बिनभांड्याचा स्वंयपाक, चित्रकला स्पर्धा, बन्डपथक संचालन, शोभायात्रा देखावा, लेखी परीक्षा, शेकोटी कार्यक्रम न्रत्य व गीत गायन स्पर्धा इत्यादी बद्दल त्यांनी मान्यवरांना माहिती दिली.
लातूर विभागीय आयुक्त सुभाष बोथिकर यांनी पुढील वर्षी विभागीय मेळावा होणार असल्याची माहिती देऊन जिल्हा परिषदेकडून मदतीची अपेक्षा व्यक्त केली. या नंतर जिल्हा मेळावा आयोजन समितीचे प्रमुख देविदास कोरे आपल्या  मनोगतात म्हणाले, “ मेळावा स्थळी सर्वांना आवश्यक त्या सोई सुविधां उपलब्ध करून देण्यात आल्याचे सांगून  सर्व विद्यार्थी व स्काऊट गाईड शिक्षकांना मेळावा येशस्वी करण्यासाठी सहकार्य केल्याबद्दल त्यांनी धन्यवाद दिले. तसेच विद्यालयत येण्यासाठी आर्धा किलोमीटर रस्ता कच्चा व खराब असल्याची बाब जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दतात्रय बनसोडे गुरुजींच्या कानावर घातली. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माध्यमिक शिक्षणाधिकारी भाऊसाहेब तुपे आपल्या मनोगतात म्हणाले, “ आपण सर्व जिल्ह्यातील वेगवेगळ्या शाळा तालुक्यातून या मेळाव्याच्या निमित्ताने एकत्र आलात. या विद्यालयाच्या भव्य पटांगणात मेळाव्याच्या निमित्ताने खूप कमी कालावधीत शक्य त्या सुविधा आपणास उपलब्ध करून दिल्या त्या खरोखरच स्तुत्य आहेत. आपण सर्वजण या मेळाव्यात एकमेकत मळून मिसळून राहिलात, आपल्यात विचारांची देवाण घेवाण झाली. नवीन ओळखी व मित्र मिळाले. नव्या जाणीवा, नवी प्रेरणा, चेतन्य निर्माण होऊ शकले. स्वत्वाची जाणीव झाली. आपली कामे आपणच करायची हा संस्कारही झाला. जीवनाच्या वास्तवतेची खऱ्या अर्थाने ओळख झाली. हि अत्यंत महत्वाची अनुभूती आपणास या तीन दिवसाच्या मेळाव्यातून मिळाली. असे सांगून त्यांनी विविध स्पर्धेत यशस्वी झालेल्या शाळांच्या संघांचे कोतूक करून त्यांना सुभेच्छा दिल्या. या प्रसंगी दिलीप धुमाळ यांनीही आपले विचार मांडले.
यानंतर लातूर जिल्हा परिषदेचे तथा कार्यक्रमाचे अध्यक्ष दत्तात्रय बनसोडे गुरुजी अध्यक्षीय समारोपात म्हणाले, “ ऐक्य व संघटन हे आपल्या देशाचे बळ व सामर्थ्य आहे. म्हणून स्काऊट ही चळवळ त्यासाठी कटीबद्ध होऊन काम करणारी चळवळ आहे. स्काऊट च्या विद्यार्थ्यांनी श्रमदानाच्या माध्यमातून पावसाचा प्रत्येक थेंब जिरवण्याची मोहीम राबवावी. जर आपल्या गावचे पाणी आपल्याच गावात आडवून जिरवले तर पाण्याची समस्या कांही प्रमाणात सुटण्यास मदत होऊ शकते.आपण प्रत्यक्ष मैदानात उतरून काम करणारे स्काऊट गाईडस आहात. जे स्वतः काम करतात त्यांना परमेश्वर मदत करतो. या चळवळीच्या माध्यमातून आपण भावी तरुणांनी देशातील समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध होऊन व एकत्र येऊन काम करण्याची गरज असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
शाळेसाठी अर्ध्या किलोमीटरचा रस्ता  पक्का करण्याचा प्रश्न मुख्याध्यापक देविदास कोरे यांनी मांडला तो मुलांच्या सोईसाठी निश्चित पणे आवश्यक आहे. असे सांगून त्यांनी गटविकास अधिकारी, ग्रामसेवक, व सरपंचांनी या बाबतीत लक्ष्य घालून तात्काळ जिल्हा परिषदेकडे प्रस्ताव पाठवावा. तो मंजूर करून रस्त्याचा प्रश्न सोडवला जाईल असे आश्वासन दिले. यानंतर माध्यमिक शिक्षणाधिकारी भाऊसाहेब तुपे, जिल्हापरिषद अध्यक्ष दत्तात्रय बनसोडे गुरुजी व मान्यवरांच्या हस्ते मेळाव्यात झालेल्या विविध स्पर्धेत यश मिळवणाऱ्या स्काऊट गाईड संघाना कार्यालयाच्या वतीने शिल्ड, प्रमाणपत्र व गुलाबपुष्प देऊन सन्मानित करण्यात आले मेळाव्याच्या यशस्वितेसाठी परिश्रम घेणाऱ्या जिल्हा मेळावा आयोजन समितीचे प्रमुख जयहिंद विद्यालयाचे मुख्याध्यापक देविदास कोरे, सहशिक्षक सुधाकर परिहार, सुनील तारे, शिशिर पवार, शुभांगी कामशेट्टी, बळवंत पाटील, सुरेश धुमाळ, ताहेर शेख, वामनराव सुरवसे, सेवक रावसाहेब कोरे,विलास पांढरे, धर्मा लांडगे, यांचा कार्यालयाच्या वतीने शिक्षणाधिकारी भाऊसाहेब तुपे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्र संचालन व आभार प्रदर्शन गिरी सर यांनी केले. शेवटी सामुहिक राष्ट्रगीत होऊन तीन दिवसीय स्काऊट गाईड जिल्हा मेळाव्याची सांगता झाली.                                                      
- देविदास कोरे
मुख्याध्यापक
जयहिंद विद्यालय सिंदीजवळगा
ता. निलंगा जिल्हा. लातूर.
मो. नं- 97 30 32 5000
Email: devidaskore21@gmail.com