पहा नवीन अपडेट

शैक्षणिक लेख व अन्य माहिती पूर्ण आशा शैक्षणिक ब्लॉगवर आपले मन:पूर्वक स्वागत.

20 November 2016

मूल्यशिक्षण : दशा व दिशा

मूल्यशिक्षण  हा शिक्षणाचा मूलाधार आहे. शिक्षणातून सुसंस्कृत मानव घडावा. समाजाचा  नेतिक स्तर उंचावा म्हणून प्राचीन गुरुकुल पद्धतीपासून ते १९८६ च्या राष्ट्रीय शेक्षणिक धोरणापर्यंत चारित्र्य संवर्धनावर विशेष भर देण्यात आला. १९६४ मध्ये शिक्षण आणि राष्ट्रीय विकास या शिक्षण आयोगात डॉ. कोठारी यांनी नेतिक मुल्यांची जोपासना हे शिक्षणाचे प्रमुख उदिष्ट  मानले.
   माणसाला स्वताचे माणूसपण शिक्षणातून गवसले पाहिजे. विद्यार्थ्याचे मन, शरीर व आत्मा या त्रीयी मध्ये जे सुप्त उतमत्व आहे. त्याचा सर्वांगीण विकास घडवणं, शिलवान, चारित्र्य संपन्न,संस्कारक्षम पिढी निर्माण कारण या दृष्टीकोनातून उद्याचा आदर्श भारत आजच्या शालेय वर्गातून घडला पाहिजे. ही महात्मा गांधी, रवींद्रनाथ टागोर, डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची सर्वकष अपेक्षा होती. पण ती आजच्या शिक्षणातून सध्या होत आहे का? असा प्रश्न निर्माण होत आहे.
व्यक्तीचा सर्वांगीण विकास हे शिक्षणाचं ध्येय आहे. मानवी जीवनाच्या  बॊद्धिक, सामाजिक, राजकीय, आर्थिक, भोतिक, सोदर्यविषयक व सांकृतिक अंगाबाबत जे उत्कृष्ट नेतिक व समाजमान्य आहेत. ती मुल्य विद्यार्थ्यात संक्रमित झाली पाहिजेत. व्यक्तीचं अंतर्बाह्य जीवन सुखी, शांत, समाधानी, विकसित व उन्नत व्हावं, सत्य, सुंदर, हि मुल्य मनात रुजावीत हे मुल्य शिक्षणाचं व्यापक उद्धिष्ट आहे. व्यक्तिगत, सामाजिक, व राष्ट्रीय मुल्य विद्यार्थ्यात अनओपचारिक शिक्षणातून संस्करीत होणे आपेक्षित आहे.मूल्य ही अमूर्त संकल्पना आहे. सुसंस्कारित व्यक्तीच्या आचार विचारातून मूल्य व्यक्त होतात. प्रत्यक्ष आचरणातून मूल्यांचे संरक्षण, जतन संवर्धन व संक्रमण होत असते. सुसंस्कासंपन्न व्यक्तिमत्व हा मूल्यशिक्षणाचा उद्देश आहे. या दृष्टीने मूल्यशिक्षण व्यक्तित्व विकासाचे साधन आहे.
माणूस किती वर्ष जगला यापेक्षा तो कसा जगावा हे महत्वाचे आहे. म्हणून मूल्याशिक्षणाचा हेतू व्यापक आहे.पण आज शाळांत दिल्या जाणाऱ्या मूल्यशिक्षणातून तो सफल होत आहे का ? स्वावलंबन, श्रमप्रतिष्ठा, राष्ट्रभक्ती, वेज्ञानिक दृष्टीकोन, समता, बंधुभाव, अहींसा, मानवता, शिस्त, संवेदनशीलता, न्यायप्रियता, सोजन्य, सहिष्णूता, खिलाडूवृत्ती, सर्वसमभाव, परस्पर सहकार्य, आदरभाव, राष्ट्रीय एकात्मता, आदी मूल्यापेकी किती मूल्य सध्या दिल्या जाणाऱ्या मूल्याशिक्षणातून विद्यार्थ्यात संस्कारीत संक्रमित होत आहेत ?  शांतता,  सामंजश्य, सहानभूती, सरह्दयता, या प्रवृत्ती विद्यार्थ्यात जोपासल्या जात आहेत का ? वर्तन, शील, चारित्र्य, त्याग, सारासार विवेक, समतोल दृष्टी, निरपेक्ष वृत्ती, हे व्यक्तिमत्वाचे पेलू विकसित होत आहेत का ? मूल्यशिक्षणातून किती विद्यार्थ्यात आत्मभानाची जाणीव विकसित होत आहे.
गुरुजन वाडीलधारी माणसं याना आजच्या विद्यार्थ्याकडून मान आदर मिळतो का ? नसेल तर आशी परिस्थिती का निर्माण व्हावी याला जबाबदार असलेल्या घटकांनी आत्मशोध घेणे आवश्यक नाही का ? सध्या मूल्यशिक्षण शाळांमधून कर्तव्यनिष्ठेने, व प्रभावीपणे दिले जाते का ? या प्रश्नांची उत्तरे फारशी समाधानकारक नाहीत हि वस्तविकता प्रांजळपणे मान्य करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांच्या मनोवृत्तीत आपण आत्तापर्यंत सर्वसाधारण मूल्यही का संस्कारित करू शकलो नाही. याचा अंतर्मुख होऊन विचार करण्याची गरज निर्माण होत आहे.
समाजात अस्थिरता, अशांतता, अविश्वास, स्वार्थ, लाचारी, धर्मांधता, कटुता द्वेश, भ्रष्टाचार, तिरस्कार, अनाचार, या दुष्प्रवृत्ती फोफावत आहेत. माया स्नेह, आपुलकी, जिव्हाळा, दया, क्षमा, शांती, सरह्द्यता,सहानभूती, व मानवता संपत आहे. शिस्त, ज्ञान, शील, प्रामाणीकपणा चारित्र्य याला  गोणत्त्व येत आहे.
झटपट श्रीमंत कसे होता येईल ? याकडेच अनेकांचे लक्ष लागले आहे. यातूनच समाजविघातक हिंसक प्रवृत्ती बळावत आहेत. समाजाचा नेतिक स्तर खालावत आहे. त्याग, तत्त्वनिष्ठा, सहिष्णूता,सत्य, सदाचरण, इत्यादी मूल्य पायदळी तुडवली जात आहेत. बेईमानी, फुटीरता, कट्टर धार्मिकता, संकुचित प्रादेशिकता जातीयता, भ्रष्टाचार, चंगळवाद बोकाळला आहे. उबग आणणारं सत्तापिपासू राजकारण ,केबल, दूरदर्शन मालिका, चित्रपट यातून होत असलेले मूल्यहीन संस्कार या अनेकविध समाजविघातक अनिष्ट प्रवृत्तींचा कळत नकळत, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष परिणाम बालवयातील संस्कारक्षम मुलांवर होणे अपरिहार्य आहे. समाजव्यवस्थाच आशा अपप्रवृत्तीत रुतत चालली असल्याने प्राचीन भारतीय संस्कृतीतील आदर्श मूल्यांना तडे जात आहेत.
समाज परिवर्तनाची दिशा ठरवण्याचं सामर्थ्य मूल्यशिक्षणात असलं तरी सध्या शिक्षण हा व्यवसाय झाला आहे. त्याला पुरती बाजारू अवकळा आली आहे. शिक्षणा विषयी काडीचीही आस्था नसणाऱ्या राज्यकर्त्यांनी शिक्षणक्षेत्रात धुमाकुळ घातला आहे. शेक्षणिक दुरदृष्ठीचा आभाव, ध्येयवादाचा दुष्काळ, प्रवेशातील भ्रष्टाचार बिनबोभाट सुरु आहे. निकाल वृद्धीसाठी आनिष्ट् मार्ग आवलबण्याची प्रवृत्ती वाढत आहे. शिक्षण क्षेत्राचं हे चित्र निराशाजनक आहे.
शाळांतून जे मूल्यशिक्षण विद्यार्थ्यांना देणं, रुजवणं, संक्रमित  तथा संस्कारित होणं अभिप्रेत आहे. त्यालाच भ्रष्ट शिक्षण प्रक्रियेत  तिलांजली मिळत आहे. परिणामत: मूल्यशिक्षणाची दिशा व दशा खालावत आहे. ही चिंताजनक बाब आहे. मूल्यशिक्षणाची आशी स्थिती व्हावी ही एक प्रकारची शोकांतिकाच नव्हे का ? आजच्या शिक्षणातून माणूस घडत आहे कि बिघडत आहे.? आस प्रश्न निर्माण होत आहे. शिकलेली मुलं बंद, मोर्चे, लुटालूट, जाळपोळ,,  मोडतोड आशी हिंसक कृत्य करतात. समाजविघातक प्रवृत्ती, लाचलुचपत, व्यासनांधता, बेजबाबदारी, झुंडशाही, अविवेक, विध्वंसक प्रवृत्ती इत्यादी आजच्या शिक्षण व्यवस्थेची कटू अपत्यच नव्हेत का ? या बाबीचा गांभीर्याने विचार होणे आवश्यक आहे.
मुळात शिक्षणाचा संबंध आचार विचार व वर्तनाशी आहे. म्हणून विद्यार्थ्यांच्या मनावर मूल्य सुसंस्कारित व्हावीत या दृष्ठीने विचार व आचारात साम्य  पाहिजे. खरं म्हणजे घर हीच पहिली संस्कार शाळा आहे. म्हणून घराघरातून सोख्य, प्रेम,दया, त्याग, सत्य, नम्रता, सदभाव, राष्ट्रभक्ती इत्यादी सद्गुणांची जपणूक वडिलधाऱ्या व्यक्तींच्या विचार आचारातून होणे आवश्यक आहे.
बालवयात झालेले संस्कारमूल्य चिरकाल टिकून राहतात. म्हणून कुटूंब व शाळांतून सुसंस्कारासाठी अनुकूल वातावरण निर्माण केले पाहिजे. जीवनातील संकटं आवाहनं पेलण्याचं सामर्थ्य व बळ मुलांना सुसंस्कारातून लाभत लाभत असते. त्यामुळे मुलांच्या निकोप शारीरिक व मानसिक वाढीकडे माता,पिता,कुटूंब, समाज, शाळा व गुरुजनांकडून जाणीवपूर्वक लक्ष देणे आवश्यक आहे. तरच योग्य वयात विध्यार्थ्यात अक्षर जीवन मूल्यांचे बीजारोपण होऊन मूल्यशिक्षणाचा हेतू साध्य होईल असा विश्वास वाटतो.
- देविदास कोरे
मुख्याध्यापक
जयहिंद विद्यालय सिंदीजवळगा
ता.  निलंगा जि. लातूर
मो. नं -97 30 32 5000
Email ID: devidaskore21@gmail.com

18 November 2016

शिक्षकांच्या मानगुटीवर सेल्फीचा खुळ खुळा

लीकडे शिक्षण क्षेत्रात दिवसागणिक नव नवीन प्रयोग सुरू आहेत. ते आता शिक्षकांच्याही अंगवळणी पडत आहेत. एखाद्या दिवशी शिक्षण खात्याचा नवीन नियम वाचण्यात आला नाही अथवा कानावर पडला नाही तर शिक्षकांना ओशाळल्यासारखे होऊन आज कालचा जुनाच दिवस आहे की काय ? असा भाबडा भ्रम होतो ! ही सध्याच्या शिक्षणक्षेत्रातील वास्तविकता आहे. ती कशी नाकारता येईल ?
शिक्षणाच्या आयचा घो होय ! आता असे म्हणायचीच स्थिती सध्याच्या शिक्षण व्यवस्थेत निर्माण झाली आहे. तीन नोव्हेंबर २०१६
रोजी स्थलांतरित होणाऱ्या व शाळेत अनियमित राहणाऱ्या मुलांना शाळेत नियमित करण्याबाबत शासन निर्णय घेण्यात आला असून त्यामुळे शिक्षण क्षेत्रात एकाच खळबळ उडाली आहे. जानेवारी २०१७ पासून महिन्याच्या दर सोमवारी शाळेच्या पटावर असलेल्या वर्गातील मुलांची उपस्थिती पडताळण्यासाठी वर्ग शिक्षकांनी मुलांचे दहा दहा चे गट करून त्यांची सेल्फी काढावी. या सेल्फी मध्ये असलेल्या मुलांची नावे आणि आधार क्रमांकासह हे सेल्फी फोटो शिक्षण खात्याच्या सरल वेबसाईटवर ऑनलाईन अपलोड करायवे. असे निर्देश या शासनादेशात देण्यात आले आहेत.
राज्यातील कांही शाळांमध्ये दोन हजारांपेक्क्षाही अधिक विध्यार्थी संख्या आहे. दहा दहा च्या गटात वर्ग शिक्षकांने मुलांसोबत सेल्फी काढायची म्हंटले तर दिवस तरी पुरेल का ? हे काढलेले सेल्फीचे फोटो ऑनलाईन अपलोड कराचे ! खेड्यापाड्यातील किती शाळांमध्ये संगणक चालू स्थितीत आहेत? जलदगती इंटरनेट ची सुविधा वस्ती, पाडे, तांडे व खेड्यातील शाळांमध्ये आहे का ? कांही शाळांमध्ये मुख्याध्यापकांची पदे रिक्त आहेत तर बहुतांश शाळांत पुरेशा संख्येत शिक्षक नाहीत. या वस्तुस्थितीचा कसलाही विचार न करता शिक्षण खात्याने  अफलातून निर्णय घेवून शिक्षकांच्या हाती मात्र सेल्फीचा खुळ खुळा दिला आहे. आता दीपावली सुट्ट्या संपून जिल्याहातील शाळा २१ नोव्हेंबर पासून सुरु होत आहेत. खेड्यातील शाळांमध्ये सुरवातीचे तीन चार दिवस मुलांची उपस्थिती नगण्य असते. सुरवातीच्या आठवड्यात शाळेचे तोंड न पाहणाऱ्या मुलांना शाळेत आणून सेल्फी काढण्यासाठी शिक्षकांना कमालीची कसरत करावी लागणार आहे. त्यामुळे शिक्षकांमधून तीव्र संताप व्यक्त होत असून शिक्षण क्षेत्रात एकाच खळबळ निर्माण झाली आहे.
शिक्षकांची नेमणूक नेमकी कशासाठी आहे ? असा प्रश्न आता प्रामुख्याने निर्माण झाला आहे ? शिक्षकांनी मुलांना शिकवायचे सोडून ही व अशीच अन्य कामे करायची का ? वर्गात मुलांना शिकवण्यासाठी शिक्षकांना पुरेसा वेळ मिळाला नाही तर मुले कशी शिकतील ? ती प्रगत होतील का ? शिक्षकांना आशा कामात जर गुंतवून ठेवले तर शाळा कशा प्रगत होतील ? असे अनेक गंभीर प्रश्न निर्माण होत असून हा निर्णय अव्यवहार्य असल्याच्या प्रतिक्रिया शिक्षकांमध्ये उमटत आहेत. शिक्षणाचा मूळ हेतू गुंडाळून ठेवून वस्तुस्थितीचा कसलाही विचार न करता सेल्फी सारखे निर्णय होत असतील तर ही खेदाची बाब आहे.
देविदास कोरे
(लेखक, जयहिंद विद्यालय सिंदीजवळगा ता. निलंगा जि. लातूर येथे मुख्याध्यापक आहेत.)
पूर्व प्रसिद्धी -  दै. ‘पुण्यनगरी’ दि. १७ नोव्हें २०१६

10 November 2016

माती…… ( Kavita )

मी
हातातले
मोती
फेकून दिले.
अन ….
हातात
माती घेतली
मोत्या पेक्षा
मातीच
मला
मोलाची वाटली.
ती
मुठभर माती
मला
जगण्याचं बळ
वाटली.
त्या
मातीचा
वास
मला
परिचित होता.
बापाने
आयुष्यभर
गाळलेल्या
घामाचाच
तिला
गंध होता.
ती माती
मीतसाच
न्याहाळीत होतो
आयुष्य माझं
तिच्या
स्रजनक्षमतेत
उलगडत….
शोधत….
होतो.
- देविदास कोरे ( लातूर )
MO - 97 30 32 5000
Email: devidaskore21@gmail.com.