पहा नवीन अपडेट

शैक्षणिक लेख व अन्य माहिती पूर्ण आशा शैक्षणिक ब्लॉगवर आपले मन:पूर्वक स्वागत.

18 August 2014

शालेय योगा विभागीय क्रीडा स्पर्धेसाठी सुमित माने याची निवड

निलंगा :-
लातूर जिल्हा विभागीय क्रीडा कार्यालयाच्या वतीने सन २०१४ - १५  या शेक्षणिक वर्षात क्रीडा संकुल येथे नुकत्याच घेण्यात आलेल्या १४ वर्ष वयोगटातील जिल्हास्तरीय शालेय योगा क्रीडा स्पर्धेत सिंदीजवळगा ता. निलंगा येथील जयहिंद विद्यालयात इयत्ता आठवीत शिकत असलेला विद्यार्थी  सुमित समिंदर माने याने लातूर जिल्हास्तरीय शालेय योगा स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला असून त्याची निवड विभागीय स्पर्धेसाठी झाली आहे. त्याबद्दल विद्यालयाचे मुख्याध्यापक देविदास कोरे सहशिक्षक एस. बी. परिहार, एस. व्ही. पवार क्रीडा शिक्षक एस. व्ही. तारे यांनी त्याचे आभिनंदन केले आहे.

10 August 2014

राज्यघटनेत असलेल्या पण त्याची अंमलबजावणी केली जात नसलेल्या धनगरांच्या आरक्षणा संदर्भात कांही प्रश्न

नगर समाज आरक्षण अंमलबजावणी संदर्भात गेल्या अनेक दिवसांपासून राज्यभरात विविध मार्गांनी तीव्र आंदोलन करत आहे. पण सुस्त व सत्तेत मदमस्त असलेल्या सरकारकडून आरकक्षणाचा निर्णय चालढकल करून विलंब केला जात आहे त्या अनुषंगाने खालील प्रश्न निर्माण झाले असून या तीव्र प्रश्नांची सरकारकडूनत्वरीत उकल होऊन धनगर समाजाला न्याय मिळणे आवश्यक आहे.
०१) राज्य घटनेत धनगर - धनगड  समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण असूनही गेल्या ६७ वर्षा      पासून र आणि ड चा शाब्दिक घोळ घालून त्याची अंमलबजावणी सरकार कडून का करण्यात आली नाही…?
०२) देशातील अन्य राज्यांनी एस. टी. आरक्षणाची आमलबजावणी करून धनगरांना न्याय दिला असताना पुरोगामीतत्वाचा टेंभा मिरवणाऱ्या महाराष्ट्रात मात्र राज्यघतनेतील हाकाच्या आरक्षणा पासून धनगराना आजतागायत का…?  वंचित ठेवले आहे…?
०३) अज्ञानी जंगलात व रानावनात भटकंती करीत फिरणाऱ्या भोळ्या भाबड्या मुळ आदिवासी  धनगर समाजाला  फसवण्याचं हे षड्यंत्र नव्हे का …?
०४) परम पुज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटनेत मुळ आदिवासी धनगर समाजाचा समावेश अनुसूचित जमातीत केलेला असूनही राज्यसरकार त्याच्या अंमलबजावणीची शिफारस केंद्र सरकारकडे का करत नाही…?
०५) हाक्काच्या आरक्षणा पासून धनगरांना वंचित ठेवण्याचे पातक सरकार का….? करत आहे…?
०६) आरक्षणा अभावी धनगरांच्या अनेक पिढ्या आजपर्यंत बरबाद झाल्या. त्याला कोण जबाबदार आहे…?
०७) सत्ता वंचितांना न्याय देण्यासाठी असते का….? का त्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहण्यासाठी असते…?
०८) न्याय व सनदशीर मार्गाने हे आंदोलन व लढा गेल्या ६७ वर्षापासून सुरु आहे. पण साधी न्याय मागणीही का मान्य केली जात नाही... ?
०९) गेल्या  ६७ वर्षापासून हा अन्याय होत असूनही तो आज पर्यंत मूकपणे धनगर समाजाने सहन केला हा संयम व ही सहनशिलता नव्हे का ….?
१०) या समाजाकडून आणखी किती संयम व सहनसिलता अपेक्षित आहे…?
११) लाखो धनगर समाजबांधवांनी पंढरपूर ते बारामती शांततेत व सनदशीर मार्गाने पदयात्रा काढली. सरकारचे लक्ष्य   वेधले….?
१२) अमरण नऊ  दिवसांचे उपोषण करण्यात आले. पण उपोशनकर्त्यांना भेटायला सरकारच्या कोणत्याही मंत्र्याना वेळ का ….? मिळाला नाही.…?
१३) चक्री उपोषण झाले अनेकांची तबीयत बिघडली  पण सरकारला त्याचीही साधी दाखल घ्यावीशी का…? वाटली नाही….?
१४) आख्खा महाराष्ट्र या आंदोलनाने ढवळून निघाला आहे. स्वातंत्र्या नंतर हा समाज पूर्णता एकवटला असून त्यांना आपल्याला न्याय हक्कापासून वंचित ठेवल्याची जाणीव झाली आहे. सर्वत्र हे आंदोलन सनदशीर मार्गाने  सुरु असतानाही सरकार वेळकाढू पणा का करत आहे ….? धनगरांच्या न्याय मागणीकडे गांभीर्याने का पाहिले जात नाही…?
१३) धनगरांचा राज्य घटनेत एस. टी. प्रवर्गात समावेश असूनही  गेल्या ६७ वर्षापासून त्याच्या आमलबजावणी ची मागणी जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवण्याचे कटकारस्थान का…?  केले जात आहे…?
१५) घटनेत नसलेले आरक्षण सरकार देऊ शेकते तर मग राज्यघटनेने दिलेल्या आरक्षणाची अंमलबाजावणी  करण्याची शिफारस सरकार का…? करत नाही….?
१६) धनगर समजाच्या आरक्षण अंमलबजावणी संदर्भात हा दुजाभाव नाही का….? सरकार आशी सापत्नभूमिका का घेत आहे….?
१७) जंगलात व रानावनात भटकंती करणारा धनगर समाज मुळातच सरळमार्गी, संयमी व सहनशील  आहे. हा आज पर्यंतचा इतिहास असून तसी नोंद इंग्रजांनी ग्याझेट  मध्ये सुद्धा केलेली असताना या समाजाच्या शांततामय आंदोलनाला गालबोट लावून तमाम धनगर बांधवांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक का केला जात आहे...?
१८) धनगर  व आमच्या आदिवासी बांधवांत बुद्धिभेद व तेढ निर्माण करण्याचे  कुटील षड्यंत्र, कपट कारस्थान  व महा कुंभाड रचून हे आंदोलन दडपण्याचे प्रयत्न का केला जात आहे….?               
सरकारने या संदर्भात लवकर निर्णय न घेता हा प्रश्न असाच ताटकळत, तापवत ठेवला व त्यामुळे तीव्र उद्रेकातून अप्रिय घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण असणार आहे…?
कांही नगण्य अप्रिय अपवाद वगळता आजपर्यंत धनगर समाजाचे हे आंदोलन शांततामय व सनदशीर  मार्गानेच झाले आहे.राज्यघटनेने दिलेल्या न्याय हक्काची मागणी मान्य होई पर्यंत हे आंदोलन सुरु ठेवावे पण त्याला गालबोट लागणार नाही याची दक्षता घ्यावी.
- देविदास कोरे ( लातूर )
मो - 97 30 32 5000
Email : devidaskore21@gmail.com

धनगराना आरक्षण नाकारणे हा राज्यघटनेशी द्रोह

नगर जमातीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटनेत अनुसूचित जमातीचे आरक्षण दिलेले आहे. जातीयवादी सरकार आकस व सूडबुद्धीने गेल्या साठ पासष्ठ वर्षापासून धनगर जमातीवर सातत्याने अन्याय करत आहे. हि अत्यंत निषेधार्य बाब आहे. याबाबत अनु. जमाती मंत्रालयाच्या 2008-09 च्या वार्षिक अहवालातील अनु. जमातीची इंग्रजी यादी पाहू. छत्तीसगढ-(33) oran, dhanka, dhangad, गुजरात-(24) rabari, हिमाचलप्रदेश-(2) gaddi, जम्मू-काश्मीर-(10) bakkarwal, झारखंड-(25) oran, dhangar (oraon), कर्नाटक-(28) kuruba, केरळ- (18) kurumbar, kurumban, मध्यप्रदेश-(35) oraon, dhanka, dhangad, महाराष्ट्र-(36) oraon, dhangad, ओडिसा-(53) oraon, dhangar, uran. आता याच अहवालाच्या हिंदी भाषांतरामध्ये dhangad हा शब्द कसा लिहिला आहे ते पाहू.
  • झारखंड-उरांव, धनगर, ओरांव; मध्यप्रदेश-ओरान, धांका, धंगाद;
  • महाराष्ट्र-ओरान, धनगर; ओडिसा-ओरांव, धनगर, उरान. यावरुन dhangad या इंग्रजी शब्दाचे मराठी किंवा हिंदी रुप धनगर असल्याचे स्पष्ट होते.
  • याव्यतिरिक्त धनगर हे विविध राज्यात वेगवेगळ्या नावानी ओळखले जातात.
  • उदा. गुजरात-रबारी, हि. प्रदेश-गड्डी, महाराष्ट्र, म. प्रदेश, ओडिसा, झारखंड, उ.प्रदेश- धनगर, कर्नाटक, आं.प्रदेश, तमिळनाडू, केरळ-कुरुब, कुरुम्बर. या सर्व जमातींचा समावेश त्या-त्या राज्यात अनु.जमातीत आहे. या सर्व जमातींचा व्यवसाय, दैवते, चालीरिती, परंपरा या समान आहेत. धनगरी ओव्या, गजी न्रुत्य, मेंढपाळ व्यवसाय हे समान धागे आढळतात. अगदी या विविध नावानी गुगल सर्च केले तरी या सर्व जाती धनगर (shepherd) असल्याचे दिसेल.
विविध घटनात्मक यंत्रणानीही वेळोवेळी धनगर आणि धनगड एकच असल्याचे अभिप्राय दिले आहेत. १९३१ मध्ये ब्रिटीश सरकारने केलेल्या जातनिहाय जन गणनेमध्ये 'ओरान' या जमातीची समकक्ष जमात म्हणून धनगर जमातीचा उल्लेख केला आहे. १९६८ साली केंद्र सरकारने प्रसिद्ध केलेल्या Bibliography of SC, ST & marginal tribes (पृष्ठ क्र. २९४) वर 'धनगर' (धनगड नव्हे) अनुसूचित जमात आहे असे नमूद केले आहे. १९८२ साली प्रसिद्ध केलेल्या याच ग्रंथाच्या आवृत्तीत 'धनगर' अशीच नोंद आहे. केंद्र सरकारच्या १९६१ च्या जनगणना अहवालात धनगर जमात अनुसूचित जमातीत समाविष्ठ असल्याचे म्हटले आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाने २००९ साली दिलेल्या निकालात म्हटले आहे, "धनगर हि उत्तरप्रदेश, बिहार आणि पश्चिम बंगाल मध्ये अनुसूचित जातीत मोडते तर महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशमध्ये त्यांचा समावेश अनुसूचित जमातीत आहे." राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाने धनगर आणि धनगड एकच असल्याचे मान्य केले आहे. (Minutes of 29th meeting of NCSC, ३/१२/२०१२). या सर्व बाबी पहाता धनगर आणि धनगड एकच असल्याचे दिसते.
  तरीही केवळ तांत्रिक दोषाचा बाऊ करुन आजपर्यंत धनगर समाजाला अनु. जमातीच्या सवलतींपासून वंचित ठेवले गेले. घटनेने धनगराना दिलेल्या सवलतींपासून त्याना वंचित ठेवणे म्हणजे घटनेशी द्रोह करणे होय.
- देविदास कोरे (लातूर )
मो - 97 30 32 5000
Email: devidaskore21@gmail.com