मूल्यशिक्षण हा शिक्षणाचा मूलाधार आहे. शिक्षणातून सुसंस्कृत मानव घडावा. समाजाचा नेतिक स्तर उंचावा म्हणून प्राचीन गुरुकुल पद्धतीपासून ते १९८६ च्या राष्ट्रीय शेक्षणिक धोरणापर्यंत चारित्र्य संवर्धनावर विशेष भर देण्यात आला. १९६४ मध्ये शिक्षण आणि राष्ट्रीय विकास या शिक्षण आयोगात डॉ. कोठारी यांनी नेतिक मुल्यांची जोपासना हे शिक्षणाचे प्रमुख उदिष्ट मानले.
माणसाला स्वताचे माणूसपण शिक्षणातून गवसले पाहिजे. विद्यार्थ्याचे मन, शरीर व आत्मा या त्रीयी मध्ये जे सुप्त उतमत्व आहे. त्याचा सर्वांगीण विकास घडवणं, शिलवान, चारित्र्य संपन्न,संस्कारक्षम पिढी निर्माण कारण या दृष्टीकोनातून उद्याचा आदर्श भारत आजच्या शालेय वर्गातून घडला पाहिजे. ही महात्मा गांधी, रवींद्रनाथ टागोर, डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची सर्वकष अपेक्षा होती. पण ती आजच्या शिक्षणातून सध्या होत आहे का? असा प्रश्न निर्माण होत आहे.
व्यक्तीचा सर्वांगीण विकास हे शिक्षणाचं ध्येय आहे. मानवी जीवनाच्या बॊद्धिक, सामाजिक, राजकीय, आर्थिक, भोतिक, सोदर्यविषयक व सांकृतिक अंगाबाबत जे उत्कृष्ट नेतिक व समाजमान्य आहेत. ती मुल्य विद्यार्थ्यात संक्रमित झाली पाहिजेत. व्यक्तीचं अंतर्बाह्य जीवन सुखी, शांत, समाधानी, विकसित व उन्नत व्हावं, सत्य, सुंदर, हि मुल्य मनात रुजावीत हे मुल्य शिक्षणाचं व्यापक उद्धिष्ट आहे. व्यक्तिगत, सामाजिक, व राष्ट्रीय मुल्य विद्यार्थ्यात अनओपचारिक शिक्षणातून संस्करीत होणे आपेक्षित आहे.मूल्य ही अमूर्त संकल्पना आहे. सुसंस्कारित व्यक्तीच्या आचार विचारातून मूल्य व्यक्त होतात. प्रत्यक्ष आचरणातून मूल्यांचे संरक्षण, जतन संवर्धन व संक्रमण होत असते. सुसंस्कासंपन्न व्यक्तिमत्व हा मूल्यशिक्षणाचा उद्देश आहे. या दृष्टीने मूल्यशिक्षण व्यक्तित्व विकासाचे साधन आहे.
माणूस किती वर्ष जगला यापेक्षा तो कसा जगावा हे महत्वाचे आहे. म्हणून मूल्याशिक्षणाचा हेतू व्यापक आहे.पण आज शाळांत दिल्या जाणाऱ्या मूल्यशिक्षणातून तो सफल होत आहे का ? स्वावलंबन, श्रमप्रतिष्ठा, राष्ट्रभक्ती, वेज्ञानिक दृष्टीकोन, समता, बंधुभाव, अहींसा, मानवता, शिस्त, संवेदनशीलता, न्यायप्रियता, सोजन्य, सहिष्णूता, खिलाडूवृत्ती, सर्वसमभाव, परस्पर सहकार्य, आदरभाव, राष्ट्रीय एकात्मता, आदी मूल्यापेकी किती मूल्य सध्या दिल्या जाणाऱ्या मूल्याशिक्षणातून विद्यार्थ्यात संस्कारीत संक्रमित होत आहेत ? शांतता, सामंजश्य, सहानभूती, सरह्दयता, या प्रवृत्ती विद्यार्थ्यात जोपासल्या जात आहेत का ? वर्तन, शील, चारित्र्य, त्याग, सारासार विवेक, समतोल दृष्टी, निरपेक्ष वृत्ती, हे व्यक्तिमत्वाचे पेलू विकसित होत आहेत का ? मूल्यशिक्षणातून किती विद्यार्थ्यात आत्मभानाची जाणीव विकसित होत आहे.
गुरुजन वाडीलधारी माणसं याना आजच्या विद्यार्थ्याकडून मान आदर मिळतो का ? नसेल तर आशी परिस्थिती का निर्माण व्हावी याला जबाबदार असलेल्या घटकांनी आत्मशोध घेणे आवश्यक नाही का ? सध्या मूल्यशिक्षण शाळांमधून कर्तव्यनिष्ठेने, व प्रभावीपणे दिले जाते का ? या प्रश्नांची उत्तरे फारशी समाधानकारक नाहीत हि वस्तविकता प्रांजळपणे मान्य करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांच्या मनोवृत्तीत आपण आत्तापर्यंत सर्वसाधारण मूल्यही का संस्कारित करू शकलो नाही. याचा अंतर्मुख होऊन विचार करण्याची गरज निर्माण होत आहे.
समाजात अस्थिरता, अशांतता, अविश्वास, स्वार्थ, लाचारी, धर्मांधता, कटुता द्वेश, भ्रष्टाचार, तिरस्कार, अनाचार, या दुष्प्रवृत्ती फोफावत आहेत. माया स्नेह, आपुलकी, जिव्हाळा, दया, क्षमा, शांती, सरह्द्यता,सहानभूती, व मानवता संपत आहे. शिस्त, ज्ञान, शील, प्रामाणीकपणा चारित्र्य याला गोणत्त्व येत आहे.
झटपट श्रीमंत कसे होता येईल ? याकडेच अनेकांचे लक्ष लागले आहे. यातूनच समाजविघातक हिंसक प्रवृत्ती बळावत आहेत. समाजाचा नेतिक स्तर खालावत आहे. त्याग, तत्त्वनिष्ठा, सहिष्णूता,सत्य, सदाचरण, इत्यादी मूल्य पायदळी तुडवली जात आहेत. बेईमानी, फुटीरता, कट्टर धार्मिकता, संकुचित प्रादेशिकता जातीयता, भ्रष्टाचार, चंगळवाद बोकाळला आहे. उबग आणणारं सत्तापिपासू राजकारण ,केबल, दूरदर्शन मालिका, चित्रपट यातून होत असलेले मूल्यहीन संस्कार या अनेकविध समाजविघातक अनिष्ट प्रवृत्तींचा कळत नकळत, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष परिणाम बालवयातील संस्कारक्षम मुलांवर होणे अपरिहार्य आहे. समाजव्यवस्थाच आशा अपप्रवृत्तीत रुतत चालली असल्याने प्राचीन भारतीय संस्कृतीतील आदर्श मूल्यांना तडे जात आहेत.
समाज परिवर्तनाची दिशा ठरवण्याचं सामर्थ्य मूल्यशिक्षणात असलं तरी सध्या शिक्षण हा व्यवसाय झाला आहे. त्याला पुरती बाजारू अवकळा आली आहे. शिक्षणा विषयी काडीचीही आस्था नसणाऱ्या राज्यकर्त्यांनी शिक्षणक्षेत्रात धुमाकुळ घातला आहे. शेक्षणिक दुरदृष्ठीचा आभाव, ध्येयवादाचा दुष्काळ, प्रवेशातील भ्रष्टाचार बिनबोभाट सुरु आहे. निकाल वृद्धीसाठी आनिष्ट् मार्ग आवलबण्याची प्रवृत्ती वाढत आहे. शिक्षण क्षेत्राचं हे चित्र निराशाजनक आहे.
शाळांतून जे मूल्यशिक्षण विद्यार्थ्यांना देणं, रुजवणं, संक्रमित तथा संस्कारित होणं अभिप्रेत आहे. त्यालाच भ्रष्ट शिक्षण प्रक्रियेत तिलांजली मिळत आहे. परिणामत: मूल्यशिक्षणाची दिशा व दशा खालावत आहे. ही चिंताजनक बाब आहे. मूल्यशिक्षणाची आशी स्थिती व्हावी ही एक प्रकारची शोकांतिकाच नव्हे का ? आजच्या शिक्षणातून माणूस घडत आहे कि बिघडत आहे.? आस प्रश्न निर्माण होत आहे. शिकलेली मुलं बंद, मोर्चे, लुटालूट, जाळपोळ,, मोडतोड आशी हिंसक कृत्य करतात. समाजविघातक प्रवृत्ती, लाचलुचपत, व्यासनांधता, बेजबाबदारी, झुंडशाही, अविवेक, विध्वंसक प्रवृत्ती इत्यादी आजच्या शिक्षण व्यवस्थेची कटू अपत्यच नव्हेत का ? या बाबीचा गांभीर्याने विचार होणे आवश्यक आहे.
मुळात शिक्षणाचा संबंध आचार विचार व वर्तनाशी आहे. म्हणून विद्यार्थ्यांच्या मनावर मूल्य सुसंस्कारित व्हावीत या दृष्ठीने विचार व आचारात साम्य पाहिजे. खरं म्हणजे घर हीच पहिली संस्कार शाळा आहे. म्हणून घराघरातून सोख्य, प्रेम,दया, त्याग, सत्य, नम्रता, सदभाव, राष्ट्रभक्ती इत्यादी सद्गुणांची जपणूक वडिलधाऱ्या व्यक्तींच्या विचार आचारातून होणे आवश्यक आहे.
बालवयात झालेले संस्कारमूल्य चिरकाल टिकून राहतात. म्हणून कुटूंब व शाळांतून सुसंस्कारासाठी अनुकूल वातावरण निर्माण केले पाहिजे. जीवनातील संकटं आवाहनं पेलण्याचं सामर्थ्य व बळ मुलांना सुसंस्कारातून लाभत लाभत असते. त्यामुळे मुलांच्या निकोप शारीरिक व मानसिक वाढीकडे माता,पिता,कुटूंब, समाज, शाळा व गुरुजनांकडून जाणीवपूर्वक लक्ष देणे आवश्यक आहे. तरच योग्य वयात विध्यार्थ्यात अक्षर जीवन मूल्यांचे बीजारोपण होऊन मूल्यशिक्षणाचा हेतू साध्य होईल असा विश्वास वाटतो.
- देविदास कोरे
मुख्याध्यापक
जयहिंद विद्यालय सिंदीजवळगा
ता. निलंगा जि. लातूर
मो. नं -97 30 32 5000
Email ID: devidaskore21@gmail.com