पहा नवीन अपडेट

शैक्षणिक लेख व अन्य माहिती पूर्ण आशा शैक्षणिक ब्लॉगवर आपले मन:पूर्वक स्वागत.

23 June 2014

जयहिंद विद्यालया चा निकाल ९३.०२ टक्के

निलंगा:-
माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या शालांत प्रमाणपत्र परीक्षेत सिंदीजवळगा ता. निलंगा येथील जयहिंद विद्यालयाचा निकाल ९३.०२ टक्के लागला आहे. विद्यालयातील कृष्णा संजीव सिरसल्ले याने ९०.६० टक्के गुण घेऊन केंद्रात दुसरा तर विद्यालयातून प्रथम येण्याचा मान मिळवला. तसेच वर्षा बालाजी धुमाळ हिने ८७. ४० टक्के गुण घेवून शाळेतून द्वितीय व वेष्णवी रंगराव धुमाळ हिने ८४. ८० टक्के गुण घेवून तृतीय येण्याचा मान मिळवला. याबरोबरच ज्योती गंगाधर हराळे हिला ८४ टक्के तर आरती युवराज धुमाळ हिला ८३.८० टक्के गुण मिळाले. विद्यालयातून विशेष प्राविण्यासह  दहा, प्रथम श्रेणीत आकरा व द्वितीय श्रेणीत एकोणीस विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. शाळेने उज्ज्वल निकालाची परंपरा कायम राखली असून  यशस्वी विद्यार्थ्यांचे आभिनंदन कार्याध्यक्ष वसंतराव पाटील, मुख्याध्यापक देविदास कोरे, पालक,शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी केले आहे.
S 001.jpg
       
   कृष्णा सिरसल्ले            वर्षा धुमाळ             वेष्णवी धुमाळ          ज्योती हराळे           आरती धुमाळ
       ९०. ६०                    ८७. ४०                    ८४. ८०                 ८४. ००                   ८३. ८०

11 March 2014

सरकार सुस्त : गारपिटग्रस्त शेतकरी मात्र त्रस्त

वकाळी गारपिटीच्या जबर तडाख्याने मराठवाडयातील शेतकरी हवालदिल झाला असून निसर्गाच्या भीषण प्रकोपाने तो देशोधडीला लागला आहे. बिगर मोसमी आवकाळी पाऊस व गारपिटीच्या भीषण तांडवाने गेल्या आठ दहा दिवसापासून कहर केला असून लातूरसह मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांना निसर्गाच्या या भयानक प्रकोपाचा जबर फटका बसला आहे.

वादळी वाऱ्यासह झालेल्या प्रचंड गारपिटीने कधी नव्हे एवढी भयानक हानी झाली असून शेतकऱ्यांचे जीवन पुरते उध्वस्त झाले आहे. रबी पिकांची पुरती नासाडी होऊन ती जमीनदोस्त झाली आहेत. फळबागा झडून व फळे सडून गेली आहेत. आंब्यांचा मोहोर पुरता झडला आहे. ऊस भूईसपाट झाला आहे. तोडणी होऊन फुटवा झालेल्या ऊसाची पाने पूर्णपणे झडून केस विनचरल्यासारखी झाली आहेत.  हातातोंडला आलेली रबी ज्वारी, गहू, करडा, वटाणा, हरभरा, आदी पिके गारपिटीच्या जबर तडाख्याने मातीत गेली आहेत. विजेची खांबे व झाडे उन्मळून पडली आहेत.
शेतातील कडब्याच्या गंजी वादळी वाऱ्याने अस्ताव्यस्त उडून जाऊन भिजल्या असून कडबा जनावरांकरिता खाण्या योग्य राहिला नसल्याने चाऱ्याचा भीषण प्रश्न निर्माण झाला आहे. जनावरांचा आसरा नाहीसा झाला आहे. पशुधानाचीही जबर हानी झाली आहे. घरावरील पत्रे उडून गेली आहेत. मराठवाड्यात सुमारे आठ लाख हेक्टर पेक्षा अधिक शेतीशेत्रावरील पिकांची नासाडी झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आसला तरी ही प्रचंड हानी व नासाडी सार्वत्रीक आहे त्यामुळे निश्चित आकडेवारी आणि नुकसानीचा अंदाज बांधणे कठीण आहे. वादळी वारे व आवकाळी पावसाचा कहर सुरूच असून शेतकरी भेदरलेल्या व धास्तावलेल्या अवस्थेत आहेत.
पोटच्या पोरासारखं मोठ्या कष्टानं जपलेल्या पिकांची ही भयानक नासाडी पाहून शेतकऱ्यांच्या काळजाचा थरकाप उडाला आहे. गेल्या आठ दहा दिवसातच होत्याचं नव्हतं झाल्याने शेतकऱ्यावर खूप मोठे आस्मानी संकट कोसळले असून निसर्गाच्या या भीषण तांडवाने शेतकऱ्यांचे जीवनच गारद केले आहे.पण नेतेमंडळी मात्र लोकसभेच्या जागावाटप व निवडणुकीच्या रणधुमाळीत पुरते  व्यस्त असल्याचे दिसत आहे.
सत्ता प्राप्तीसाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या कांही नेतेमंडळीना आता जाग आली आहे. त्यांच्याकडून शेतकऱ्यांच्या आश्रुवर मतांची पोळी भाजण्याचा कुटील डाव आखला जाण्याची शक्यताही आहे. गारपिटग्रस्त भागाच्या पाहणीचे आता दवरे आखले जात आहेत. राज्यावर एवढी भीषण आपत्ती वोढवून आठ दहा दिवस उलटल्यानंतर मुख्यमंत्र्यानाही नुकसानग्रस्त भागाच्या पाहणी दवरयासाठी वेळ मिळाला आहे
गारपिटग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळावी म्हणून कमालीचा आक्रोश सुरु आहे पण सुस्तावलेल्या मायबाप सरकारच्या कानावर अद्याप हा टाहो पोहंचला नसल्याने शेतकरी हतबल झाले आहेत.निवडणूक कामात गुंतलेली सुस्त व मस्तवाल यंत्रणा आठ दहा दिवस उलटल्या नंतरही  पंचनामे करण्याच्याच  नवटंकित मश्गुल असल्याचे चित्र आहे. वास्तविक हे आतोनात झालेली हानी सार्वत्रिक असताना हाताचा कंकणाला आरशाची गरजच काय ? खुलेआम या प्रचंड आपत्तीची झळ सर्वच शेतकऱ्यांना बसल्याचे वास्तविक चित्र सर्वत्र आहे. मग असे असतानाही पंचनाम्याचा देखावा करून वेळकाढूपणा केला जात  असल्याने शेतकऱ्यांत कमालीची खदखद व उद्वेगाच्या भावना उमटत आहेत. आम्हाला कोणी वाली आहे का ? असा संतप्त सवाल शेतकरी करत आहेत.
निवडणूकीच्या रणधुमाळीत शेतकऱ्यांच्या झालेल्या या वताहाती कडे कमालीचे दुर्लक्ष्य होत असल्याची भावना बळावत चालली आहे. संप मोर्चे काढणाऱ्या कार्मच्यारांच्या बाबतीत तातडीने निर्णय घेऊन त्यांच्या मागण्या मान्य करणारे सरकार शेतकऱ्यांची फरफट करत असल्याने  प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. ही भीषण आपत्ती ओढवून आठ दहा दिवस उलटले तरी ही वस्तुस्थिती तातडीने निवडणूक आयोगाच्या निदर्शनास आणून देऊन त्यांच्या संमतीने शेतकऱ्यांना तात्काळ मदतीची व्यवस्था का करता येऊ शकली नाही असा प्रश्न निर्माण होत आहे. वेळेवर मदत मिळण्याच्या प्रतीक्षेत शेतकरी आस लाऊन बसले आहेत.
अवकाळी गारपिटीच्या पावसाने हतबल होऊन रस्त्यावर आलेल्या शेतकऱ्यांना वेळ निघून गेल्यावर मदत मिळण्यापेक्षा ती तातडीने त्यांच्या पदरात पडणे आवश्यक आहे. पण निवडणूक आयोगाची परवानगी व आचारसंहितेचा बाऊ करून वेळकाढूपणा सुरु असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. वास्तविक पहाता मेटाकुटीला आलेल्या व भीषण परस्थितीला तोंड देत  असलेल्या शेतकऱ्यांना सरसकट वीज बील, पिक कर्ज माफी व भरीव आर्थिक मदत त्वरीत देऊन दिलासा देणे व कोसळलेल्या या आपतीतीतून त्यांना बाहेर काढणे सध्याच्या परस्थितीत गरजेचे आहे.  
-  देविदास कोरे ( लातूर )
मो. नं. 97 30 32 5000
Email: devidaskore21@gmail.com.

12 February 2014

जयहिंद विद्यालय सिंदीजवळगा येथे स्काऊट गाईड जिल्हा मेळावा संपन्न

भारत स्काऊट गाईड लातूर जिल्हा कार्यालय व जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीने आयोजित कब- बुलबुल व स्काऊट गाईड जिल्हा मेळावा आठ ते दहा फेबुरवारी दरम्यान सिंदीजवळगा ता. निलंगा येथील जयहिंद विद्यालयात संपन्न झाला. जिल्ह्यातील विविध तालुक्यातून सहभागी झालेल्या ४७ कब बुलबुल व स्काऊट गाईड संघाचे सुमारे एक हजार ते बाराशे विधार्थ्यांनसह स्काऊट गाईड शिक्षकांचे शनिवार दि. आठ फेबु रोजी सकाळी ११:०० वाजता जयहिंद विद्यालयाच्या भव्य प्रांगणात आगमन होऊन संघ नोंदणी, तंबू उभारणी, व उद्घाटन कार्यक्रमाचा सराव झाला.                                
जिल्हा मेळाव्याचे उद्घाटन नऊ फेबु रोजी सकाळी ११:०० वाजता कोषाध्यक्ष महराष्ट्र राज्य भारत स्काऊट गाईड संघ मुंबई येथील बी. सी. हंगे यांच्या हस्ते झाले. यावेळी झालेल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष लातूर येथील महाराष्ट्र राज्य विभागीय मंडळाचे सदस्य तानाजी पाटील हे होते.प्रमुख पाहुणे म्हणून लातूर विभागाचे विभाग प्रमुख सुभाष डुकरे, लातूर जिल्हा संघटन आयुक्त गोविंद केंद्रे, उस्मनाबाद जिल्हा संघटन आयुक्त इरले, परभणी स्काऊट गाईडचे जिल्हा चिटणीस सुधाकर आंदोले, लातूर स्काऊट गाईडचे जिल्हा चिटणीस चंद्रकात साळुंके, लातूर जिल्हा मुख्यालय आयुक्त एल. एम. डुरे, श्रीमती जोती मंगलगे उपाध्यक्षा श्रीमती सुमित्रा सुडे, सुनिता आरळीकर, लातूर जिल्हा स्काऊट गाईडचे कोषाध्यक्ष ए. बी. बिडवे, सहायक जिल्हा आयुक्त एस. एन. सिरमाळे, सिंदीजवळग्याच्या सरपंच हिरकणबाई घोलप, माजी सरपंच गोविंद सिरसले, रामेगावचे माजी चेरमण शिवाजी शेळके, मुख्याध्यापक राजेश्वर पाटील, पांडुरंग रेड्डी, अभिमन्यू गट्टे, दवनगिरे सर, सय्यद सर, श्रीमती पाटील मडम, निलंगा तालुका क्रीडा प्रमुख शिंदे सर, स्काऊट गाईड जिल्हा मेळावा आयोजन समिती प्रमुख तथा जयहिंद विद्यालयाचे मुख्याध्यापक देविदास कोरे आदी मान्यवर उपस्थित होते. सर्वांचे शाल श्रीफळ हार व गुलाब पुष्प देऊन विद्यालयाच्या वतीने स्वागत सत्कार करण्यात आला.    
कार्यक्रमाच्या सुरवातीला मान्यवरांना स्काऊट गाईड पथकाने संचालन करून मानवंदना दिली. यावेळी कांही सांस्कृतिक गीत व न्रत्यांचेही सादरीकरण औसा येथील मुक्तेश्वर विद्यालय, लातूर येथील गोदावरीदेवी कन्या विद्यालय, तळीखेड येथील जिल्हा परिषद प्रशाला व अहमदपूर येथील विमलबाई देशमुख विद्यालयाच्या संघांनी केले.
लातूर जिल्हा संघटन आयुक्त गोविंद केंद्रे यांनी प्रास्ताविकपर मनोगतात मागील मेळाव्यांचा मागोवा घेऊन या मेळाव्यात सभागी झालेल्या सर्व स्काऊटर्सना जयहिंद विद्यालय प्रशासनाने आवशक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल आभार व्यक्त केले. मेळावा आयोजन समिती प्रमुख देविदास कोरे यांनी हा जिल्हा मेळावा घेण्याचा योग शाळेला लाभल्याबद्दल समाधान व्यक्त करून केवळ चारपाच दिवसात या मेळाव्याची तयारी केल्याचे सांगितले व सर्व सहभागी शाळांच्या स्काऊट गाईड संघाना मेळाव्याच्या सुभेछा दिल्या. बी. सी. हंगे  कोषाध्यक्ष महराष्ट्र राज्य भारत स्काऊट गाईड संघ मुंबई हे आपल्या मनोगतात म्हणाले, “ स्काऊट गाईड ही संस्काराची चळवळ असून आडीआडचणीना कसं सामोरं जायचं याचा वस्तूपाठच या माध्यमातून विद्यार्थ्यांना मिळतो. पुस्तकी ज्ञानापेक्षा रानावनात स्वतः तंबू उभारून तीन दिवस येथे राहत असताना येणारे अनुभव प्रत्यक्ष वास्तव जीवनाची ओळख करून देणारे असतात. आपण वेगवेगळ्या ठिकाणाहून येथे एकत्र येऊन मिळूनमिसळून राहत असतो आणि त्यातून एकोपा जपला जातो हे अत्यंत म्हत्वाचे आहे.”
अध्यक्षीय मनोगतात विभागीय मंडळाचे सदस्य तानाजी पाटील म्हणाले, “ या मेळाव्यात मुलींची संख्या लक्षणीय असून ही अभिनंदनीय बाब आहे. वेगवेगळ्या शाळांच्या स्काऊट गाईड संघांनी जे गीत व न्रत्य सादर केले ते खरोखरच वाखंण्यायोग्य आहे. आपल्यातील सुप्त कलागुणांना आशा मेळाव्यातून वाव मिळतो व आपला सर्वांगीण विकास साध्य होऊ शकतो. मेळाव्यात ज्या वेगवेगळ्या स्पर्धा घेतल्या जातात त्यातूनही प्रेरणा व स्फूर्ती मिळते.” कार्यक्रमाचे सूत्र संचालन व आभार प्रदर्शन गिरी सर यांनी केले या कार्यक्रमास मेळाव्यासाठी जिल्ह्यातील वेगवेगळ्या शाळातून आलेले सुमारे बाराशे विद्यार्थी स्काऊट गाईड शिक्षक व  गावकरी उपस्थित होते.
नऊ फेबु रोजी सायंकाळी ठीक सात वाजता जयहिंद विद्यालयाच्या प्रांगणात भव्य शेकोटी कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाचे उद्घाटन शेकोटी पेटूवून भारत स्काऊट गाईडचे राष्ट्रीय आयुक्त भा.ई.नागराळे (दिल्ली) व लातूर जिल्हा मुख्य आयुक्त वसंतराव पाटील यांच्या हस्ते झाले. या वेळी विभागीय आयुक्त सुभाष बोथिकर सिंदीजवळगा येथील उपसरपंच दिवाकर सिरसले, शिवाजी शेळके, लिंबराज मगर, मुख्याध्यापक देविदास कोरे आदी मान्यवर उपस्थित होते. जयहिंद विद्यालयातील स्काऊट गाईड च्या मुलीनी हातात ज्योत घेऊन ज्योत से ज्योत जगावो हा नयनरम्य देखावा गीत सादर केले.
या प्रसंगी मनोगत व्यक्त करताना राष्ट्रीय आयुक्त भा. ई. नागराळे म्हणाले, “ या मेळाव्यातील स्काऊट गाईडरसचा उत्साह पाहून मी आनंदी झालो असून या ठिकाणी सुरु असलेले सांस्कृतिक कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या स्पर्धा या सर्वांनी इथले वातावरण भारावून गेले आहे. मला राष्ट्रीय आयुक्त म्हणून वेगवेगळ्या राज्यात फिरण्याचा योग येतो पण लातूरचं डोळ्यात भरणारं वेगळेपण मात्र जाणवतं असे गोरवोद्गार काढून ते म्हणाले, “ स्काऊट गाईड मधून स्वत्वाची जाणीव विकसित होते त्याच बरोबर काटकसर, सहास,राष्ट्रीय एकात्मता, श्रम प्रतिष्ठा, सांघिक भावना आदी मुल्यांचा संस्कार आपल्या मनावर होतो. म्हणून स्काऊट गाईड ही चळवळ जात,धर्म,भाषा या पलीकडे जाऊन माणूसकीची शिकवण देणारी आहे. ती जगातील अनेक देशात सक्रिय पणे कार्यरत आहे.” या नंतर मेळाव्यात सहभागी ४७ संघांच्या गीत व न्रत्यांच्या सांस्कृतिक स्पर्धा घेण्यात आल्या या कार्यक्रमासाठी  विद्यार्थांनसह रामेगाव व सिंदीजवळगा येथील अबालवृद्ध उपस्थित होते.
सोमवार दिनांक दहा फेबु रोजी सकाळी नऊ वाजता सिंदीजवळगा येथे भव्य जनजागृती व शोभायात्रा काढण्यात आली.गावातील पदाधिकारी जेष्ठ नागरिक व अनेक मान्यवर यात सहभागी झाले होते.त्यात पर्यावरण संरक्षण, मुलींचे शिक्षण, या बरोबरच विवेकानंद, शिवाजी महाराज, सावित्रीबाई फुले या व अन्य महापुरूषाच्या वेशभूषा परिधान  करून या जनजागृती फेरीत सुमारे बाराशे विद्यार्थांनी आपला सहभाग नोंदवला.
या नंतर दुपारी एक वाजता समारोप व बक्षीस वितरण कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लातूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दतात्रय बनसोडे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून माध्यमिक शिक्षणाधिकारी भाऊसाहेब तुपे, स्काऊट गाईडचे जिल्हा चिटणीस चंद्रकांत साळुंखे, कोषाध्यक्ष ए.बी. बिडवे, सह्यक सचिव दिलीप धुमाळ, जिल्हा संघटन आयुक्त गोविंद केंद्रे, विभागीय आयुक्त सुभाष बोथिकर, मुख्याध्यापक देविदास कोरे शिवाजी शेळके, सरपंच घोलप आदी मान्यवर व्यास्पीठावर उपस्थित होते.कार्यक्रमाच्या सुरवातीला मान्यवरांना स्काऊट गाईड पथकाने संचालन करून मानवंदना दिली. यावेळीही  कांही सांस्कृतिक गीत व न्रत्यांचे विद्यार्थांनी सादरीकरण केले. स्काऊट गाईड कार्यालय व शाळेचा वतीने मान्यवरांचा शाल,श्रीफळ, हार व स्काऊटचा स्कार्फ घालून सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा संघटन आयुक्त गोविंद केंद्रे यांनी केले. या मेळाव्यात विद्यार्थ्यांच्या घेण्यात आलेल्या तंबू सजावट, बिनभांड्याचा स्वंयपाक, चित्रकला स्पर्धा, बन्डपथक संचालन, शोभायात्रा देखावा, लेखी परीक्षा, शेकोटी कार्यक्रम न्रत्य व गीत गायन स्पर्धा इत्यादी बद्दल त्यांनी मान्यवरांना माहिती दिली.
लातूर विभागीय आयुक्त सुभाष बोथिकर यांनी पुढील वर्षी विभागीय मेळावा होणार असल्याची माहिती देऊन जिल्हा परिषदेकडून मदतीची अपेक्षा व्यक्त केली. या नंतर जिल्हा मेळावा आयोजन समितीचे प्रमुख देविदास कोरे आपल्या  मनोगतात म्हणाले, “ मेळावा स्थळी सर्वांना आवश्यक त्या सोई सुविधां उपलब्ध करून देण्यात आल्याचे सांगून  सर्व विद्यार्थी व स्काऊट गाईड शिक्षकांना मेळावा येशस्वी करण्यासाठी सहकार्य केल्याबद्दल त्यांनी धन्यवाद दिले. तसेच विद्यालयत येण्यासाठी आर्धा किलोमीटर रस्ता कच्चा व खराब असल्याची बाब जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दतात्रय बनसोडे गुरुजींच्या कानावर घातली. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माध्यमिक शिक्षणाधिकारी भाऊसाहेब तुपे आपल्या मनोगतात म्हणाले, “ आपण सर्व जिल्ह्यातील वेगवेगळ्या शाळा तालुक्यातून या मेळाव्याच्या निमित्ताने एकत्र आलात. या विद्यालयाच्या भव्य पटांगणात मेळाव्याच्या निमित्ताने खूप कमी कालावधीत शक्य त्या सुविधा आपणास उपलब्ध करून दिल्या त्या खरोखरच स्तुत्य आहेत. आपण सर्वजण या मेळाव्यात एकमेकत मळून मिसळून राहिलात, आपल्यात विचारांची देवाण घेवाण झाली. नवीन ओळखी व मित्र मिळाले. नव्या जाणीवा, नवी प्रेरणा, चेतन्य निर्माण होऊ शकले. स्वत्वाची जाणीव झाली. आपली कामे आपणच करायची हा संस्कारही झाला. जीवनाच्या वास्तवतेची खऱ्या अर्थाने ओळख झाली. हि अत्यंत महत्वाची अनुभूती आपणास या तीन दिवसाच्या मेळाव्यातून मिळाली. असे सांगून त्यांनी विविध स्पर्धेत यशस्वी झालेल्या शाळांच्या संघांचे कोतूक करून त्यांना सुभेच्छा दिल्या. या प्रसंगी दिलीप धुमाळ यांनीही आपले विचार मांडले.
यानंतर लातूर जिल्हा परिषदेचे तथा कार्यक्रमाचे अध्यक्ष दत्तात्रय बनसोडे गुरुजी अध्यक्षीय समारोपात म्हणाले, “ ऐक्य व संघटन हे आपल्या देशाचे बळ व सामर्थ्य आहे. म्हणून स्काऊट ही चळवळ त्यासाठी कटीबद्ध होऊन काम करणारी चळवळ आहे. स्काऊट च्या विद्यार्थ्यांनी श्रमदानाच्या माध्यमातून पावसाचा प्रत्येक थेंब जिरवण्याची मोहीम राबवावी. जर आपल्या गावचे पाणी आपल्याच गावात आडवून जिरवले तर पाण्याची समस्या कांही प्रमाणात सुटण्यास मदत होऊ शकते.आपण प्रत्यक्ष मैदानात उतरून काम करणारे स्काऊट गाईडस आहात. जे स्वतः काम करतात त्यांना परमेश्वर मदत करतो. या चळवळीच्या माध्यमातून आपण भावी तरुणांनी देशातील समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध होऊन व एकत्र येऊन काम करण्याची गरज असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
शाळेसाठी अर्ध्या किलोमीटरचा रस्ता  पक्का करण्याचा प्रश्न मुख्याध्यापक देविदास कोरे यांनी मांडला तो मुलांच्या सोईसाठी निश्चित पणे आवश्यक आहे. असे सांगून त्यांनी गटविकास अधिकारी, ग्रामसेवक, व सरपंचांनी या बाबतीत लक्ष्य घालून तात्काळ जिल्हा परिषदेकडे प्रस्ताव पाठवावा. तो मंजूर करून रस्त्याचा प्रश्न सोडवला जाईल असे आश्वासन दिले. यानंतर माध्यमिक शिक्षणाधिकारी भाऊसाहेब तुपे, जिल्हापरिषद अध्यक्ष दत्तात्रय बनसोडे गुरुजी व मान्यवरांच्या हस्ते मेळाव्यात झालेल्या विविध स्पर्धेत यश मिळवणाऱ्या स्काऊट गाईड संघाना कार्यालयाच्या वतीने शिल्ड, प्रमाणपत्र व गुलाबपुष्प देऊन सन्मानित करण्यात आले मेळाव्याच्या यशस्वितेसाठी परिश्रम घेणाऱ्या जिल्हा मेळावा आयोजन समितीचे प्रमुख जयहिंद विद्यालयाचे मुख्याध्यापक देविदास कोरे, सहशिक्षक सुधाकर परिहार, सुनील तारे, शिशिर पवार, शुभांगी कामशेट्टी, बळवंत पाटील, सुरेश धुमाळ, ताहेर शेख, वामनराव सुरवसे, सेवक रावसाहेब कोरे,विलास पांढरे, धर्मा लांडगे, यांचा कार्यालयाच्या वतीने शिक्षणाधिकारी भाऊसाहेब तुपे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्र संचालन व आभार प्रदर्शन गिरी सर यांनी केले. शेवटी सामुहिक राष्ट्रगीत होऊन तीन दिवसीय स्काऊट गाईड जिल्हा मेळाव्याची सांगता झाली.                                                      
- देविदास कोरे
मुख्याध्यापक
जयहिंद विद्यालय सिंदीजवळगा
ता. निलंगा जिल्हा. लातूर.
मो. नं- 97 30 32 5000
Email: devidaskore21@gmail.com

07 July 2013

महागाईने जनता त्रस्त सरकार मात्र सुस्त

गेल्या दोन आडीच वर्षापासून महागाई सतत वाढत आहे. त्यात सामान्य माणूस होरपळून निघत आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमतीमुळे सर्वसामान्य जनतेला जगणे असाह्य होत आहे. गोरगरीबानी जगावे कसे ? हा जीवघेणा प्रश्न बनत आहे. वाढत्या महागाईमुळे लोक हतबल होत आहेत. आगोदरच  महागाईच्या झळा सोसून हयराण झालेल्या मध्यमवर्गीय जनतेसमोर पुन्हा  एकदा महागाईचा आगडोंब भडकण्याची चिन्हे सतत जाणवत आहेत.
अलीकडेच कांही दिवसापूर्वी पेट्रोल, डीझेल व घरगुती वापराच्या ग्यासच्या दारात वाढ झालेली आहे. वर्चेवर त्यात आणखी भर पडत आहे.  त्यामुळे आगोदरच वाढत्या महगाईला तोंड देत जगत असलेल्या जनतेला सतत वाढणाऱ्या महागाईला तोंड देत जगणे असाह्य होत आहे. महगाईने त्रासून गेलेल्या जनतेत कॉंग्रेस युपिए सरकारविषयी प्रचंड नाराजी व रोष निर्माण होत आहे.
वाढत्या महागाईला आळा घालण्यात सरकार का अपयशी ठरत आहे ? महागाई कमी होण्या ऐवजी त्यात आणखी का भर पडत आहे ? याला सरकारची धोरणेच कारणीभूत नाहीत का ? वाढत्या महागाईच्या झळा जनतेनी किती सहन करायच्या ? असे भयावह प्रश्न निर्माण होत आहेत.
भारत पेट्रोलियम , हिंदुस्तान पेट्रोलियम , इंडियन ऑईल या देशातील प्रमुख तेल कंपन्या अधूनमधून तेलाच्या दरात दरात वाढ करत असतात. त्यामुळे त्याचा देनंदिन व्यवहारावर परिणाम होवून अन्य जीवना- वश्यक वस्तूंच्या दरातही वाढ होत आहे. महागाईत भर पडून पुन्हा हा आलेख वाढतच आहे. त्यामुळे सामान्य  जनतेच्या खिशाला कात्री लागून महागाईचे  चटके  बसत आहेत. हि खेदाची बाब आह.
आंतरराष्ट्रीय राजकारणात गेल्या कांही काळापासून वेगवान घडामोडी घडत आहेत. त्यामुळे परिणामतः कच्या तेलाचे दर स्थिर नाहीत.  त्यात सतत चढ उतार सुरु आहेत. त्याचा परिणाम इंधन दर वाढीत होत आहे. त्यामुळे इतर वस्तूंच्या दरातही वाढ होत आहे. इराण हा कच्या तेलाचा प्रमुख पुरवठादार देश आहे. भारत एकूण तेलाच्या साधारणतः बारा टक्के कच्चे तेल इराण कडून आयात करतो. जर इराणने कच्या तेलाचे दर आणखी वाढवले तर इंधन दरवाढ अटळ  ठरू शकते. असे झाले तर मध्यमवर्गीय जनतेला पुन्हा वाढत्या महागाईचे चटके सहन करावे लागणार असून ते कठीण जाणार आहे. आगोदरच महागाईने हयराण झालेली जनता आणखी हतबल होऊन खिशाला बसणारा हा  चाट सहन करू शकणार नाही. त्यामुळे सरकारने यावर गांभीर्याने विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे.
वाढत्या महागाईने आता मर्यादा ओलांडली आहे. त्यात आणखी भर पडल्यास सामान्य जनतेला ते असाह्य होणार आहे. म्हणून या परिस्थितीचे गांभीर्य लक्ष्यात घेऊन वेळीच त्यावर योग्य त्या उपाय योजना करण्याची आवश्यकता प्राकर्षाने निर्माण झाली आहे.
-  देविदास कोरे ( लातूर )
  मो. 97 30 32 5000
 Email: devidaskore21@gmail.com